शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

टाळी एका हाताने वाजत नाही - अनंत गीते यांचा भाजपाला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:19 IST

युती तुटल्याने जे घडलेय ते घडलेय. ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भिन्न विचारांचे असले तरी सध्या देशात राजकारण याच धर्तीवर चालले आहे. नवीन आघाड्या होत आहेत. देशभर हे सुरू आहे.

ठळक मुद्दे ठाकरे जो निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्यच आहे व असेल, असे सांगत ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत का, या प्रश्नाचे उत्तर देणे गीते यांनी टाळले.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीआधी दिलेले समान सत्ता वाटपाचे वचन भाजपने पाळले नाही. त्यामुळेच शिवसेनेला वेगळ्या वाटेने जावे लागत आहे. भाजपने वचन पाळले असते तर ही वेळ आली नसती. त्यामुळे आता टीका करून काही उपयोग नाही. कारण टाळी एका हाताने वाजत नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी भाजपला येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झालेली असताना कॉँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा टोकाचा निर्णय योग्य आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आजच्या महाराष्ट्राची गरज लक्षात घेता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे योग्य निर्णय घेतील. युती तुटल्याने जे घडलेय ते घडलेय. ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भिन्न विचारांचे असले तरी सध्या देशात राजकारण याच धर्तीवर चालले आहे. नवीन आघाड्या होत आहेत. देशभर हे सुरू आहे. त्यामुळे प्रयोग नवीन वाटला तरी यशस्वी होऊ शकतो, असे गीते म्हणाले.भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला, हे योग्य वाटते का, असे विचारता गीते म्हणाले, भाजपला काय वाटते, हा भाजपचा प्रश्न आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. माझ्या संघटनेच्या संदर्भात मी भूमिका मांडणे योग्य आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही सरकारमध्ये होतो. त्यावेळी वाद झाले असले तरी त्यावेळची स्थिती आणि आताची स्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे.सदाचाराचा पराभवमाझा यावेळी रायगड मतदारसंघातून पराभव झाला, याला नेमकी काय कारणे आहेत, स्वकियांमुळे पराभव झाला का, यावर बोलताना गीते म्हणाले की, पराभव हा पराभवच असतो. तो मी मान्य केला आहे. मात्र, हा पराभव सदाचाराचा आहे व भ्रष्टाचाराचा विजय झाला आहे, असा टोलाही त्यांनी तटकरे यांचे नाव न घेता लगावला.मुख्यमंत्रीपदाबाबत मौनमहाविकास आघाडीची सत्ता येत असताना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी शिवसैनिक करीत आहेत. आपले काय मत आहे. आपला त्यांना पाठिंबा आहे का, याबाबत विचारता शिवसेनेत आदेश चालतो. शिवसेना शिस्तबध्द पक्ष आहे. त्यामुळे निवडून आलेल्या शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुखांनाच सर्वाधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे ठाकरे जो निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्यच आहे व असेल, असे सांगत ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत का, या प्रश्नाचे उत्तर देणे गीते यांनी टाळले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी