शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विवाह नोंदणीबाबत दिसते आहे जागरूकता!

By admin | Updated: September 24, 2015 00:11 IST

चिपळूण : १ हजार २२३ जणांकडून विवाह नोंदणी

चिपळूण : भटजीसमोर केलेला विवाह सरकार दरबारी काहीवेळा ग्राह्य धरला जात नाही. शासनाच्या आदेशानुसार विवाह नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, नगर परिषद हद्दीत सन २००८पासून आतापर्यंत १ हजार २२३ जणांनी विवाह नोंदणी केली आहे. पूर्वीच्या काळी विवाह हे भटजींच्या समोरच केले जात असत. मात्र, शासकीय पातळीवर या विवाहांना मान्यता मिळावी, यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात नोंद करणे बंधनकारक केले आहे. शासनस्तरावरून २००८पासून विवाह नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विवाह झाल्यानंतर ठराविक मुदतीत याची नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी नगर परिषद कार्यालयात स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. ५ मे २००८ पासून खऱ्या अर्थाने विवाह नोंदणीला प्रारंभ सुरु झाला. यावेळी ४० जणांनी विवाह नोंदणी केली होती. विवाह नोंदणी करणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याची जाणीव नवदाम्पत्य व त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झाल्याने आता या विवाह नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २००९मध्ये १३९, सन २०१०मध्ये १४५, सन २०११मध्ये १५५, सन २०१२मध्ये १५०, सन २०१३मध्ये २०८, सन २०१४मध्ये २०१ तर दि. १४ सप्टेंबर २०१५पर्यंत १८५ असे एकूण १ हजार २२३ जणांनी विवाह नोंदणी केली आहे. (वार्ताहर)विवाह केल्यानंतर त्याची सरकार दरबारी नोंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी २००८पासून नगर परिषद हद्दीत विवाह नोंदणी सुरू करण्यात आली आहे.