शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पविरोधी अशांत वातावरण

By admin | Updated: June 21, 2017 01:08 IST

राजापूर तालुका : कुंभवडे-नाणार परिसरातील रिफायनरी प्रकल्पासाठी अधिसूचना जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : स्थानिक जनतेचा मोठा विरोध असतानादेखील तो न जुमानता शासनाने जगातील सर्वांत मोठा असा केंद्र व राज्य सरकारचा सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प नाणार - कुंभवडे परिसरातील बाभूळवाडीत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अधिसूचनाही शासनाने जाहीर केल्याने राजापूर तालुक्यात आणखी एका प्रकल्पावरून चांगलाच संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी सुमारे दहा हजार मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर परिसरात मार्गी लागत असताना आता रिफायनरी प्रकल्प येणार हे नक्की झाल्याने भविष्यात हा तालुका प्रकल्पविरोधी अशांत वातावरणाचा राहणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. केंद्र सरकारची ४९ टक्के, तर राज्य सरकारची ५१ टक्के भागिदारी असलेला सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा पेट्रोकेमिकलचा रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार - कुंभवडे परिसरात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पंधरा हजार एकर जागेची आवश्यकता आहे. यापूर्वी रत्नागिरी, गुहागरसह जिल्ह्यात काही ठिकाणी जागांची चाचपणी करण्यात आली होती. त्यामध्ये राजापूर तालुक्याचाही सामावेश होता. मात्र, नियोजित प्रकल्पाला योग्य ठरेल, अशी प्रशस्त जागा राजापूर तालुक्यात उपलब्ध झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब होऊन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने त्याची अधिसूचना जारी केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १३ हजार ८०० एकर क्षेत्राचे सर्व्हेक्षण झाले असून, त्यामध्ये ५१ टक्के क्षेत्र पोटखराबा, तर २० टक्के क्षेत्र कातळ असल्याची माहिती शासनाने प्रसिध्द केल्यानंतर चांगलाच वादंग माजला आहे. शासनाने असा कुठलाच सर्व्हे केलेला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. कारण या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती आहेत. या प्रकल्पामुळे त्या नष्ट होतील व आमचे आतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे स्थानिक जनतेने या प्रकल्पाला कडाडून विरोध सुरु केला आहे. केंद्र सरकारच्या इंडियन आॅईल, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम व राज्य सरकार यांच्या भागिदारीतून प्रकल्प असेल व प्रतिवर्षाला ६० दशलक्ष टन रिफायनरी केली जाईल, अशी माहिती आहे. त्यामध्ये निवासी संकुलासाठी उन्हाळे, जुवाटी ते गिर्येपर्यंत जागा निश्चित केली जाईल, अशीही माहिती पुढे आली होती. सुमारे १५० एकर जागेत टाऊनशिप निश्चित करण्यात आली असल्याचे कळते. शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाला राजापूर तालुक्यात मान्यता मिळाली आहे. त्याची अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. त्याचे तीव्र पडसाद तालुक्याच्या राजकारणात उमटले आहेत. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवगळता शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने प्रकल्पाविरुध्द रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मागील काही वर्षे जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पावरुन जोरदार रणकंदन पाहायला मिळाले. आतादेखील अधूनमधून अणुऊर्जा प्रकल्पावरुन आंदोलने होत आहेत. त्यामुळे मागील दशकभर राजापूर तालुका हा अशांत होता. आता रिफायनरी प्रकल्पावरुन तालुक्यातील शांतता अधिकच बिघडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. परिणामी कायदा - सुव्यवस्थेवर मोठा ताण पडणार हे निश्चित आहे.