शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अमोल पालये यांची ‘पहिली रात्र’ एकांकिका राज्यस्तरावर द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नाटक या विषयाला वाहून कार्यरत असणाऱ्या संवाद सेवा संस्था, मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नाटक या विषयाला वाहून कार्यरत असणाऱ्या संवाद सेवा संस्था, मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेत रत्नागिरीतील नवोदित लेखक अमोल अनंत पालये यांच्या ‘पहिली रात्र’ या एकांकिकेला द्वितीय क्रमाकांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन. ते झालंच नाही तर..? आणि एखाद्याच्या मनातल्या भीतीतून अंधश्रध्देचा कसा जन्म होतो, आणि त्या अंधश्रध्देचा समाज कसा फायदा उठवतो, याचे कोकणात घडणाऱ्या कथेवरील नाट्यमय लेखन ‘पहिली रात्र’ या एकांकिकेतून लेखक अमोल पालये यांनी केले आहे. समाज व्यवस्थेवर भाष्य करणारी ही एकांकिका कोकणातील संगमेश्वरी बोलीतून लिहिण्यात आली आहे.

यापूर्वीही लेखक अमोल पालये यांनी विविध कथा, अलक, एकांकिकांचे लेखन केले असून, त्यांना विविध पारितोषिके प्राप्त झाली आहेत. तसेच अनेक कथा नामांकित दिवाळी अंकातून प्रसिध्दही झाल्या आहेत. त्यांचे ‘पायरबुवांच्या झाकन्या’ हे संगमेश्वरी बोलीतील सदर विशेष लोकप्रिय ठरले होते. याशिवाय त्यांनी ‘अक्रित झो... मरनाच्या भायरं बेफाट’ या लोकप्रिय संगमेश्वरी बोलीतील वेबसिरीजचे संवाद लेखनही केले आहे. नमन, खेळ्यातील दुर्मीळ म्हणी-बतावणी-आख्याने यांचे संकलन करण्याचे काम सध्या ते करत आहेत.

याशिवाय ते ग्रंथालय चळवळीत सक्रिय राहून विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल साहित्य क्षेत्रातील मान्यवर, लेखक, नाट्यक्षेत्रातील रंगकर्मी, पत्रकारिता श्रेत्र, ग्रंथालयप्रेमींमधून अभिनंदन होत आहे.