शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

टवाळखोर मुलांमुळे अमोल घागची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील दहीवली बुद्रुक लिमेवाडी येथील बीएस्सी आयटी झालेल्या अमोल घाग याने आठवडाभरापूर्वी केलेली आत्महत्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील दहीवली बुद्रुक लिमेवाडी येथील बीएस्सी आयटी झालेल्या अमोल घाग याने आठवडाभरापूर्वी केलेली आत्महत्या ही वाडीतील टवाळखोर मुलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे असल्याचा आरोप त्याचे वडील हेमकिरण घाग यांनी केला आहे. मृत्यूनंतर त्याच्या पाकिटातील चिठ्ठी व मोबाईलमधील ऑडिओ क्लिपमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट होत आहे़ चिठ्ठी आणि मोबाईल पोलिसांकडे देऊन याबाबत चौकशी करण्याची अपेक्षा वडील हेमकिरण घाग यांनी व्यक्त केली आहे.

अमोलच्या वडिलांनी जबाबात म्हटले आहे की, अमोलने ५ मे रोजी गोठ्यामध्ये आत्महत्या केली होती. आकस्मिक मृत्यू म्हणून सावर्डे पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे. अमोल याचे शिक्षण बीएस्सी आय.टी. होते. तो लुपिन या औषध कंपनीमध्ये नोकरीला होता. त्यापूर्वी तो अल्वम या कंपनीत होता. ३० एप्रिलला त्याने लुपिन कंपनीचा राजीनामा दिला. तत्पूर्वी अनोम या औषध कंपनीमध्ये असताना तो व त्याचे त्याच कंपनीतील मित्र रवींद्र पांडे व योगेश पोतदार यांनी लिन्कलिन या फार्मा कंपनीचे डिस्ट्रीब्युटर देशमुख यांच्याकडून कंपनी विकत घ्यायचे ठरविले होते; परंतु कोरोनामुळे ती प्रक्रिया झाली नाही. त्या मुदतीत पांडे व पोतदार हे देशमुख यांच्या लिन्कलिन कंपनीमध्ये टक्केवारीवर काम करीत होते. अमोल याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलचा पासवर्ड याेगेशला पाठविला होता. अमोलचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याने त्या पासवर्डच्या आधारे अमोलचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये एक ऑडिओ क्लिप सापडली. त्या क्लिपमध्ये अमोलने आत्महत्या करण्यापूर्वी मित्रांसह चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या वाडीतील काही लोकांनी त्याला मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे.

अमोलचे ज्या मुलीशी वर्षभरापूर्वी लग्न ठरलेले होते त्या मुलीचे व अमोलचे वैयक्तिक संवाद, फोटो लिक होत होते. त्याबाबत वाडीतील टवाळ मुले त्याला विचारत असत. त्याची टिंगल करीत असत. तो त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे आम्हाला सांगत असे म्हणून आम्ही त्याला तीन -चार मोबाईल बदलून दिलेले होते. तरीही त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे त्याने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. तत्पूर्वी, अमोलला योग्य त्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. तू त्या टवाळ मुलांकडे लक्ष देऊ नकोस, असे सांगितले. आमच्या समाधानासाठी मानसपोचार तज्ज्ञांकडे उपचार केले; परंतु अमोलमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्याचे व त्याच्या होणाऱ्या पत्नीचे संवाद गावामध्ये लिक होत होते. त्यामुळे त्या टवाळ लोकांच्या त्रासामुळे अमोल मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. त्यामुळे ज्यांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांची चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी विनंती अमोलच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.