शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

टवाळखोर मुलांमुळे अमोल घागची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील दहीवली बुद्रुक लिमेवाडी येथील बीएस्सी आयटी झालेल्या अमोल घाग याने आठवडाभरापूर्वी केलेली आत्महत्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील दहीवली बुद्रुक लिमेवाडी येथील बीएस्सी आयटी झालेल्या अमोल घाग याने आठवडाभरापूर्वी केलेली आत्महत्या ही वाडीतील टवाळखोर मुलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे असल्याचा आरोप त्याचे वडील हेमकिरण घाग यांनी केला आहे. मृत्यूनंतर त्याच्या पाकिटातील चिठ्ठी व मोबाईलमधील ऑडिओ क्लिपमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट होत आहे़ चिठ्ठी आणि मोबाईल पोलिसांकडे देऊन याबाबत चौकशी करण्याची अपेक्षा वडील हेमकिरण घाग यांनी व्यक्त केली आहे.

अमोलच्या वडिलांनी जबाबात म्हटले आहे की, अमोलने ५ मे रोजी गोठ्यामध्ये आत्महत्या केली होती. आकस्मिक मृत्यू म्हणून सावर्डे पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे. अमोल याचे शिक्षण बीएस्सी आय.टी. होते. तो लुपिन या औषध कंपनीमध्ये नोकरीला होता. त्यापूर्वी तो अल्वम या कंपनीत होता. ३० एप्रिलला त्याने लुपिन कंपनीचा राजीनामा दिला. तत्पूर्वी अनोम या औषध कंपनीमध्ये असताना तो व त्याचे त्याच कंपनीतील मित्र रवींद्र पांडे व योगेश पोतदार यांनी लिन्कलिन या फार्मा कंपनीचे डिस्ट्रीब्युटर देशमुख यांच्याकडून कंपनी विकत घ्यायचे ठरविले होते; परंतु कोरोनामुळे ती प्रक्रिया झाली नाही. त्या मुदतीत पांडे व पोतदार हे देशमुख यांच्या लिन्कलिन कंपनीमध्ये टक्केवारीवर काम करीत होते. अमोल याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलचा पासवर्ड याेगेशला पाठविला होता. अमोलचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याने त्या पासवर्डच्या आधारे अमोलचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये एक ऑडिओ क्लिप सापडली. त्या क्लिपमध्ये अमोलने आत्महत्या करण्यापूर्वी मित्रांसह चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या वाडीतील काही लोकांनी त्याला मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे.

अमोलचे ज्या मुलीशी वर्षभरापूर्वी लग्न ठरलेले होते त्या मुलीचे व अमोलचे वैयक्तिक संवाद, फोटो लिक होत होते. त्याबाबत वाडीतील टवाळ मुले त्याला विचारत असत. त्याची टिंगल करीत असत. तो त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे आम्हाला सांगत असे म्हणून आम्ही त्याला तीन -चार मोबाईल बदलून दिलेले होते. तरीही त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे त्याने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. तत्पूर्वी, अमोलला योग्य त्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. तू त्या टवाळ मुलांकडे लक्ष देऊ नकोस, असे सांगितले. आमच्या समाधानासाठी मानसपोचार तज्ज्ञांकडे उपचार केले; परंतु अमोलमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्याचे व त्याच्या होणाऱ्या पत्नीचे संवाद गावामध्ये लिक होत होते. त्यामुळे त्या टवाळ लोकांच्या त्रासामुळे अमोल मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. त्यामुळे ज्यांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांची चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी विनंती अमोलच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.