शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

आंबव पोंक्षे येथे बिबट्या पकडला

By admin | Updated: April 30, 2016 00:48 IST

बकऱ्या खाण्यासाठी आला असता जेरबंद

रत्नागिरी : गेले वर्षभर संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला आज (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता जेरबंद करण्यात आले. बकऱ्यांच्या शोधासाठी आलेला हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला व ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.आंबव पोंक्षे येथे गेले वर्षभर बिबट्या ग्रामस्थांना त्रास देत होता. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली होती. मात्र त्याला पकडण्यात यश आले नव्हते. गुरुवारी येथील ग्रामस्थ घडशी यांच्या पाच बकऱ्यांवर झडप घातली. यातील तीन बकऱ्या त्याने ठार केल्या. तर दोन बकऱ्या जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.शुक्रवारी बिबट्याने ठार केलेल्या बकऱ्या त्याच जागेवर ठेऊन देण्यात आल्या. त्याचबरोबर तेथे पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी ग्रामस्थ झाडावर दबा धरुन बसले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला बकऱ्यांच्या वासाने बिबट्या त्या ठिकाणी आला. बिबट्या येताच ग्रामस्थांनी झाडावरुन उड्या मारुन त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. त्यानंतर वनखात्याला माहिती देऊन बिबट्याला त्यांच्या ताब्यात दिले. रात्री उशीरा जवळच्या जंगलात सोडून दिले. त्यामुळे पुन्हा बिबट्या गावात येण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी दुपारी जेरबंद करण्यात आले. बकऱ्यांच्या शोधासाठी आलेला हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आंबव पोंक्षे येथे गेले वर्षभर बिबट्या ग्रामस्थांना त्रास देत होता. रात्री उशीरा हा बिबट्या तेथीलच जवळच्या जंगलात सोडून देण्यात आला. -वृत्त/५