शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंबव पोंक्षे येथे बिबट्या पकडला

By admin | Updated: April 30, 2016 00:48 IST

बकऱ्या खाण्यासाठी आला असता जेरबंद

रत्नागिरी : गेले वर्षभर संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला आज (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता जेरबंद करण्यात आले. बकऱ्यांच्या शोधासाठी आलेला हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला व ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.आंबव पोंक्षे येथे गेले वर्षभर बिबट्या ग्रामस्थांना त्रास देत होता. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली होती. मात्र त्याला पकडण्यात यश आले नव्हते. गुरुवारी येथील ग्रामस्थ घडशी यांच्या पाच बकऱ्यांवर झडप घातली. यातील तीन बकऱ्या त्याने ठार केल्या. तर दोन बकऱ्या जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.शुक्रवारी बिबट्याने ठार केलेल्या बकऱ्या त्याच जागेवर ठेऊन देण्यात आल्या. त्याचबरोबर तेथे पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी ग्रामस्थ झाडावर दबा धरुन बसले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला बकऱ्यांच्या वासाने बिबट्या त्या ठिकाणी आला. बिबट्या येताच ग्रामस्थांनी झाडावरुन उड्या मारुन त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. त्यानंतर वनखात्याला माहिती देऊन बिबट्याला त्यांच्या ताब्यात दिले. रात्री उशीरा जवळच्या जंगलात सोडून दिले. त्यामुळे पुन्हा बिबट्या गावात येण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी दुपारी जेरबंद करण्यात आले. बकऱ्यांच्या शोधासाठी आलेला हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आंबव पोंक्षे येथे गेले वर्षभर बिबट्या ग्रामस्थांना त्रास देत होता. रात्री उशीरा हा बिबट्या तेथीलच जवळच्या जंगलात सोडून देण्यात आला. -वृत्त/५