शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जून, जुलैची सरासरी ओलांडली तरी ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण निम्मेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

रत्नागिरी : यंदा जून आणि जुलै महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी ऑगस्ट महिन्यातील पाऊस मात्र सरासरीच्या तुलनेने कमी ...

रत्नागिरी : यंदा जून आणि जुलै महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी ऑगस्ट महिन्यातील पाऊस मात्र सरासरीच्या तुलनेने कमी झाला आहे. सध्याही पावसाच्या किरकोळ सरी पडत असल्याने उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. बदलत्या वातावरणामुळे आजारपणही वाढले आहे.

यंदा पाऊस अधिक पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार पावसाचा प्रवास तसा होऊ लागला होता. १६ मे रोजी झालेल्या ताैक्ते वादळाच्या प्रभावाने १ जूनपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलै महिन्यातही पावसाने अतिवृष्टी धरली. त्यामुळे या महिन्यात १८१५ मिलीमीटर इतका पाऊस झाला; मात्र ऑगस्स्ट महिन्यात पुन्हा प्रमाण कमी झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलीमीटर पाऊस पडतो. जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलीमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. तर ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते; मात्र यंदा २५ ऑगस्टपर्यंत केवळ ३६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

वातावरण बदलले काळजी घ्या...

जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यात पाऊस अधिक पडतो. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाचा जोर कमी झाला होता. जुलै महिन्यात १६ जुलैपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ९११ मिलीमीटर इतका पाऊस झाला तर जुलैअखेर १८१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाचे प्रमाण अधिकच कमी होऊ लागले आहे. आतापर्यंत ३८० मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीपेक्षाही निम्म्यानेच पाऊस झाला आहे.

गेल्या आठवड्यात तर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांत पुन्हा किरकोळ सरी पडत आहेत. अचानक वातावरण बदलले असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. कोरोना काळात ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी हेही आजार वाढत आहेत.