शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

जून, जुलैची सरासरी ओलांडली तरी ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण निम्मेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

रत्नागिरी : यंदा जून आणि जुलै महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी ऑगस्ट महिन्यातील पाऊस मात्र सरासरीच्या तुलनेने कमी ...

रत्नागिरी : यंदा जून आणि जुलै महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी ऑगस्ट महिन्यातील पाऊस मात्र सरासरीच्या तुलनेने कमी झाला आहे. सध्याही पावसाच्या किरकोळ सरी पडत असल्याने उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. बदलत्या वातावरणामुळे आजारपणही वाढले आहे.

यंदा पाऊस अधिक पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार पावसाचा प्रवास तसा होऊ लागला होता. १६ मे रोजी झालेल्या ताैक्ते वादळाच्या प्रभावाने १ जूनपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. जुलै महिन्यातही पावसाने अतिवृष्टी धरली. त्यामुळे या महिन्यात १८१५ मिलीमीटर इतका पाऊस झाला; मात्र ऑगस्स्ट महिन्यात पुन्हा प्रमाण कमी झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. या कालावधीत साधारणपणे ३३६४ मिलीमीटर पाऊस पडतो. जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलीमीटर पाऊस पडतो. जुलै महिन्यात त्यापेक्षा अधिक साधारणत: १२८६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते. तर ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर कमी होतो. या महिन्यात ८२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असते; मात्र यंदा २५ ऑगस्टपर्यंत केवळ ३६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

वातावरण बदलले काळजी घ्या...

जून आणि जुलै हे दोन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या महिन्यात पाऊस अधिक पडतो. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाचा जोर कमी झाला होता. जुलै महिन्यात १६ जुलैपासून पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ९११ मिलीमीटर इतका पाऊस झाला तर जुलैअखेर १८१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाचे प्रमाण अधिकच कमी होऊ लागले आहे. आतापर्यंत ३८० मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीपेक्षाही निम्म्यानेच पाऊस झाला आहे.

गेल्या आठवड्यात तर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांत पुन्हा किरकोळ सरी पडत आहेत. अचानक वातावरण बदलले असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. कोरोना काळात ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी हेही आजार वाढत आहेत.