शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

भातशेतीच्या मजुरीला आळा घालण्याचा कृषी विद्यापीठाचा पर्याय

By admin | Updated: September 11, 2014 23:03 IST

भविष्यातील मजुरांची समस्या लक्षात घेवून काळानुरुप बदल अपेक्षित

दापोली : दिवसेंदिवस भातशेती खर्चिक होऊ लागल्याने उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक खर्च शेतकऱ्याला मजुरीवर करावा लागत आहे. त्याचबरोबर कवळतोडणी भाजणीपासून ते रोप लावणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. मजुरीचा वाढलेला दर, उत्पन्न याचा ताळमेळ घातल्यास भातशेती शेतकऱ्याला फायेदशीर नसल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शास्त्रीय पद्धतीने भातपेरणी करुन कमी खर्चात उत्पन्न घेण्याचा पर्याय दिला आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून भाताचे नवनवीन वाण विकसित करुन शेतकऱ्याला चांगला फायदा होण्यासाठी प्रयत्न केला. परंतु अलीकडे मजुरांचा अभाव ही शतेकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचे वाढलेले दर भातशेतीतील ४ महिने केला जाणारा मेहनतीचा कालावधी पाहता भातशेती शेतकऱ्याला खर्चिक आहे. कवळतोडणी, भाजणी, रान तयार करुन पेरणी, रोपे तयार करुन नांगरणी, चिखलणी, रोपे लावणी ही सर्व कामे भातशेतीत करावी लागतात.सर्व खर्च जावून शेतकऱ्याच्या हातात केवळ पेंढा शिल्लक राहील एवढेच उत्पन्न शिल्लक राहाते. भविष्यात याकडे दुर्लक्ष होऊ शकते. भातशेतीचा खर्च पाहता अनेकजण भातशेतीकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गादी वाफे करुन थेट पेरणी केली आहे.पेरणी केल्यामुळे भातासाठी इतर कामावर होणाऱ्या खर्चाची बचत होते. ४ बाय ४ फुटाच्या गादीवाफ्यावर पेरणी करुन उत्पन्न घेण्याचा सोपा पर्याय कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांपुढे ठेवलेला आहे. या पद्धतीने मजुरीचा खर्च कमी होतो व थेट पेरणी केल्यामुळे भातपीक लवकर येते. कृषी विद्यापीठाच्या या शास्त्राचा फायदा गावागावात पोहोचल्यास मजुरांची भासणारी टंचाई दूर होणार आहे. त्यामुळे भातशेतीचा सध्या नुकसानीत असलेला प्रयोग प्रथमच फायद्यात बदलणार आहे. शेतीसाठी हे नवे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकणार आहे. (प्रतिनिधी)भविष्यातील मजुरांची समस्या लक्षात घेवून काळानुरुप बदल अपेक्षित आहेत. शेतकऱ्याला भातशेती कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.डॉ.उत्तमकुमार म्हाडकरसंशोधन संचालक