शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

वाढत्या निर्बंधांमुळे आधीच बुडत्या एस. टी.चा पाय खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे आधीच बुडत असलेल्या एस.टी.चा पाय आता ५० टक्केच भारमानाच्या निकषामुळे आणखीच खोलात गेला आहे. एका बाजूला ...

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे आधीच बुडत असलेल्या एस.टी.चा पाय आता ५० टक्केच भारमानाच्या निकषामुळे आणखीच खोलात गेला आहे. एका बाजूला कर्मचाऱ्यांच्या वेतनासह नियमित सर्व खर्च होत असताना दुसऱ्या बाजूला उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याने एस.टी.चा तोटा वाढतच चालला आहे.

शासनाने कोरोनामुळे सुरुवातीला वीकेंड लॉकडाऊन घोषित केले. त्यानंतर कडक निर्बंध जारी करण्यात आले होते. पुन्हा त्यामध्ये बदल करून पूर्ण लॉकडाऊनच घोषित केले आहे. अत्यावश्यक सेवेअंतर्गत एस.टी.ला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी लॉकडाऊनमुळे प्रवासीच नसल्याने एस.टी.ची अवस्था बिकट झाली आहे.

गतवर्षी लॉकडाऊनमुळे एस.टी.ला चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागली होती. त्यानंतर एस.टी.च्या उत्पन्नाची गाडी हळूहळू रुळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. भारमान शून्य असलेल्या मार्गावरील वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. एस.टी.चे चालक वाहकांना हजेरीसाठी आगारात यावे लागत असले तरी पन्नास टक्के उपस्थितीनुसार ड्युटी लावण्यात येत आहे.

कोरोना संकटकाळात प्रवासी वाहतुकीसाठी चालक, वाहक तयार असतानाही प्रवाशांअभावी बहुतांश मार्गांवरील फेऱ्या बंद ठेवल्या जात आहेत. सध्या ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुरू आहेत. २८ हजार किलोमीटर इतकाच प्रवास होत आहे. १० टक्क्यांपेक्षा कमी फेऱ्या सुरू असल्याने यावर्षीही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

लॉकडाऊनपूर्व दैनंदिन एस.टी.च्या ६०० गाड्या धावत असल्याने ४ हजार २०० फेऱ्यांमुळे एक लाख ८० हजार किलोमीटर वाहतूक सुरू होती. प्रवासी संख्या दोन ते सव्वादोन लाखांच्या घरात असल्याने ४८ ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत असे. मात्र, आता सध्या ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे चार ते पाच लाखांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.

..................

एकूण चालक - ९५५

वाहक - ७६९

चालक कम वाहक - १३६६

अन्य कर्मचारी - १४१०

चौकट

मंडणगड आगारातून ३, दापोली ३, खेड ७, चिपळूण १२, गुहागर ४, देवरूख ८, रत्नागिरी १६, शहरी ५, लांजा ४, राजापूर आगारातून १४ फेऱ्या दिवसाला सुटत आहे. ४४ आसनी क्षमता असली तरी केवळ २२ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी परवानगी असून, त्याचे पालन करण्यात येत आहे.

..............

शासन निर्णयाचे पालन करण्यात येत असून, प्रवासी नसल्यामुळे दिवसाला जेमतेम ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुटत आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. फेऱ्या कमी असल्यामुळे चालक-वाहकांनाही नियमानुसार ड्युटी लावली जात आहे. वाहकांचा प्रवाशांशी थेट संपर्क येत असल्याने योग्य खबरदारीचे आवाहन केले आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.