शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चंदनाचा हार अन् चांदीच्या करंडकातून मानपत्र; तब्बल ९७ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचा रत्नागिरीत झाला होता सत्कार

By शोभना कांबळे | Updated: March 1, 2024 11:43 IST

शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले

शोभना कांबळेरत्नागिरी : स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी रत्नागिरीत १ मार्च १९२७ रोजी आलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे तत्कालीन रत्नागिरी जिल्हा लोकल बोर्डाने चंदनाचा हार व मानपत्राने त्यांचे स्वागत केले. या मानपत्राचा चांदीचा करंडक येथील थरवळ कुटुंबीयांनी अजूनही जतन केला आहे. या करंडकाला शुक्रवार, १ मार्च २०२४ रोजी ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा वसा पुढच्या पिढ्याही जतन करणार आहेत.रत्नागिरीतील तेव्हाचे प्रसिद्ध वकील व्ही. डी. जोशी यांच्या खालची आळी येथील भागीरथी निवासात महात्मा गांधी २९ फेब्रुवारी १९२७ रोजी उतरले होते. गांधीजींना पाहण्यासाठी रत्नागिरीकरांंची अलोट गर्दी होती. दुसऱ्या दिवशी १ मार्च १९२७ रोजी शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा लोकल बोर्डाच्या वतीने त्यांचा चंदनाच्या हाराने आणि चांदीच्या करंडकातून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्याकाळी मानसन्मान केलेल्या वस्तूंचा लागलीच लिलाव करून गोळा झालेला निधी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वापरण्यात येत असे. गांधीजींनी प्रघाताप्रमाणे या चंदनी हार, मानपत्र व करंडकाचा त्याच जागेवर लिलाव केला. रत्नागिरीतील सुस्वभावी प्रसिद्ध व्यापारी गणपतशेठ थरवळ यांनी हा सन्मान त्याकाळी ५०० रुपयाला विकत घेतला. शुक्रवारी, १ मार्च रोजी या घटनेला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत.गांधीजींच्या या भेटीपासून गणपतशेठआणि मुकुंद व विश्वनाथ ही त्यांची दोन मुले देशभक्तीने भारावलेली होती. विश्वनाथ तर या सोहळ्याचे साक्षीदार होते. मुकुंदराव यांनी तर मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. कारावासही भोगला होता. गणपतशेठ यांनी गांधीजींच्या या चांदीच्या करंडकाचे जीवापाड जतन केले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आणि रत्नागिरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ हा करंडकाचा ठेवा जतन करीत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक योगदान तसेच महात्मा गांधी यांच्या रत्नागिरीतील पदस्पर्शाची आठवण म्हणून हा ठेवा सुभाष थरवळ जतन करीत आहेत. यानंतरही मुलगा मनीष आणि नातू सिद्धार्थ आणि त्या पुढच्याही पिढ्यान् पिढ्या हा ठेवा तेवढ्याच अभिमानाने जतन करतील, असा प्रगाढ विश्वास सुभाष थरवळ यांना आहे.करंडक अजूनही तसाच चंदनी हार काळाच्या ओघात खराब झाला. मात्र, चांदीचा करंडक अजूनही तसाच आहे. या करंडकावर ‘महात्मा गांधीजींस - रत्ननगरीत त्यांचे शुभगमनप्रसंगी रत्नागिरी लोकल बोर्डाकडून सादर अर्पण. १ मार्च १९२७,’ असा मजकूर लिहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला गांधीजींच्या चरख्याचे चित्र रेखाटलेले आहे.

थरवळ घराणे गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेले होते. त्यामुळे त्यांना सन्मानात मिळालेल्या करंडकाचेही आतापर्यंत अभिमानाने जतन करण्यात आले आहे. यापुढच्या पिढ्याही हा बहुमोल ठेवा तेवढ्याच अभिमानाने नक्कीच जतन करतील. -सुभाष थरवळ, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMahatma Gandhiमहात्मा गांधी