शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

शिक्षकांना मुख्यालय सोडण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

टेंभ्ये : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या सुटीमध्ये मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ...

टेंभ्ये :

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या सुटीमध्ये मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे करण्यात आली असल्याचे अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.

गेली दोन वर्षांपासून शिक्षक जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोविड-१९ संदर्भातील कामकाजामध्ये व्यस्त असल्याने त्यांना मुख्यालय सोडता आलेले नाही. त्यामुळे किमान यावर्षी तरी शिक्षकांना आपल्या गावी जाण्याची सशर्त परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मार्च २०२० पासून कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोविडविषयक सेवेत कार्यरत आहेत. यामध्ये जिल्ह्यात विलगीकरण कक्ष, पोलीस मित्र, रेल्वे स्टेशन व बसस्थानक तपासणी नाके, चेकपोस्ट, लसीकरण केंद्र, कोविड तपासणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय व शासकीय कार्यालयातील स्वागत कक्षात कामकाज, गावात कोविड सर्वेक्षण या ठिकाणी प्रशासनाच्या आदेशानुसार सेवा बजावत आहेत.

राज्यातील शाळांना १ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यालय सोडताना व मुख्यालयी परत येताना कोविडसंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर व कोविडसंदर्भातील देण्यात आलेली सर्व जबाबदारी पूर्ण करण्याच्या अटीवर मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आल्याचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.