शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

शिक्षकांना मुख्यालय सोडण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

टेंभ्ये : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या सुटीमध्ये मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ...

टेंभ्ये :

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या सुटीमध्ये मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे करण्यात आली असल्याचे अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.

गेली दोन वर्षांपासून शिक्षक जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोविड-१९ संदर्भातील कामकाजामध्ये व्यस्त असल्याने त्यांना मुख्यालय सोडता आलेले नाही. त्यामुळे किमान यावर्षी तरी शिक्षकांना आपल्या गावी जाण्याची सशर्त परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मार्च २०२० पासून कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोविडविषयक सेवेत कार्यरत आहेत. यामध्ये जिल्ह्यात विलगीकरण कक्ष, पोलीस मित्र, रेल्वे स्टेशन व बसस्थानक तपासणी नाके, चेकपोस्ट, लसीकरण केंद्र, कोविड तपासणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय व शासकीय कार्यालयातील स्वागत कक्षात कामकाज, गावात कोविड सर्वेक्षण या ठिकाणी प्रशासनाच्या आदेशानुसार सेवा बजावत आहेत.

राज्यातील शाळांना १ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यालय सोडताना व मुख्यालयी परत येताना कोविडसंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर व कोविडसंदर्भातील देण्यात आलेली सर्व जबाबदारी पूर्ण करण्याच्या अटीवर मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघातर्फे करण्यात आल्याचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.