शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरोप - प्रत्यारोप न करता शिवसेनेने संघटना म्हणून काम करून दाखविले : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तिन्ही जिल्ह्यांसाठी १५० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन ...

रत्नागिरी : कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तिन्ही जिल्ह्यांसाठी १५० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन दिली. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला ५० ऑक्सिजन मशीन मिळाली आहेत. एवढेच नाही; तर ५० रेमडेसिविर इंजेक्शनही दिली आहेत. आरोप - प्रत्यारोप करीत न बसता शिवसेनेने संघटना म्हणून काम करून दाखविले आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये या महामारीच्या काळात शिवसेना संघटना म्हणून काही तरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात १५० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या.

राज्यासह जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट कायम आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा राबत आहेत. तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट थोपविण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

कोरोनासारख्या महामारीत आम्ही बोलत न बसता शिवसेना संघटना म्हणून काम करून दाखविले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेकडून कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी ५० याप्रमाणे त्याचे वाटप केले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ते रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आले. जिल्ह्याला मिळालेल्या ५० ऑक्सिजन मशीनपैकी खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि मंडणगड या तालुक्यांना प्रत्येकी दहा असे वितरित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी रेमडेसिविरची ५० इंजेक्शन्स

जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठीही प्रयत्नशील आहे. आता जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी प्रमाणात आहेत. म्हणून शिवसेेना संघटनेकडून ५० रेमडेसिविर इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. त्याचे समान वाटप करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम पुन्हा राबवा

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम महाराष्ट्रात राबवा : सामंत

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी, जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी‘ अशा नावाने राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाख ८६ हजार लोकांची तपासणी केली आहे. त्यात १३६ कोरोनाबाधित सापडले आहेत. या मोहिमेचा चांगला फायदा होत असून महाराष्ट्रात पुन्हा ही योजना राबवावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे यावेळी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.