शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आरोप - प्रत्यारोप न करता शिवसेनेने संघटना म्हणून काम करून दाखविले : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तिन्ही जिल्ह्यांसाठी १५० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन ...

रत्नागिरी : कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तिन्ही जिल्ह्यांसाठी १५० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन दिली. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला ५० ऑक्सिजन मशीन मिळाली आहेत. एवढेच नाही; तर ५० रेमडेसिविर इंजेक्शनही दिली आहेत. आरोप - प्रत्यारोप करीत न बसता शिवसेनेने संघटना म्हणून काम करून दाखविले आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये या महामारीच्या काळात शिवसेना संघटना म्हणून काही तरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात १५० ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या.

राज्यासह जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट कायम आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा राबत आहेत. तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट थोपविण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

कोरोनासारख्या महामारीत आम्ही बोलत न बसता शिवसेना संघटना म्हणून काम करून दाखविले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेकडून कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी ५० याप्रमाणे त्याचे वाटप केले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ते रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आले. जिल्ह्याला मिळालेल्या ५० ऑक्सिजन मशीनपैकी खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि मंडणगड या तालुक्यांना प्रत्येकी दहा असे वितरित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी रेमडेसिविरची ५० इंजेक्शन्स

जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठीही प्रयत्नशील आहे. आता जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी प्रमाणात आहेत. म्हणून शिवसेेना संघटनेकडून ५० रेमडेसिविर इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. त्याचे समान वाटप करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम पुन्हा राबवा

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम महाराष्ट्रात राबवा : सामंत

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी, जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी‘ अशा नावाने राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाख ८६ हजार लोकांची तपासणी केली आहे. त्यात १३६ कोरोनाबाधित सापडले आहेत. या मोहिमेचा चांगला फायदा होत असून महाराष्ट्रात पुन्हा ही योजना राबवावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे यावेळी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.