शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरोप-प्रत्यारोपांचे फटाके?

By admin | Updated: November 18, 2016 23:12 IST

नगर परिषद निवडणूक : फडणवीस, दानवे, तटकरेंसह बड्या नेत्यांच्या प्रचार सभांकडे जिल्ह्याचे लक्ष

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा व एका नगर पंचायतीची निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला होत असून, प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव हे अंतिम टप्प्यातील प्रचाराची माळ गुंफण्यासाठी लवकरच जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, या प्रचारसभांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषदा व दापोली नगर पंचायतीची निवडणूक होत असली तरी यातील रत्नागिरी व चिपळूण या ब वर्गातील दोन नगर परिषदा ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार डावपेच खेळले जात आहेत. यातील रत्नागिरी नगर परिषद ही गेल्या कार्यकाळात सेना-भाजप युतीच्या ताब्यात होती. आता सेना व भाजप युती नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. ही नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असल्याने रत्नागिरी, चिपळूणमध्येही भाजपची सत्ता आल्यास विकासाचे स्वप्न नागरिकांना दाखविले जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेसाठी फडणवीस सरकारने नगरोत्थान योजनेतून ६२ कोटींची सुधारित नळपाणी योजना मंजूर केली आहे. भाजपसाठी हा प्रमुख निवडणूक मुद्दा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस २० नोव्हेंबरला रत्नागिरीत, तर २१ रोजी दानवे हे चिपळुणात सभा घेणार आहेत. रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रात गेल्या पाच वर्षात युतीने काय विकास केला, असा सवाल करीत राष्ट्रवादीचे नेते सेना, भाजपवर बरसण्याची शक्यता आहे. चिपळूण नगर परिषदेवर गेली पाच वर्षे शहर विकास आघाडीची सत्ता होती. चिपळुणात माजी आमदार रमेश कदम यांचा असलेला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते चिपळुणात प्रचार सभा घेणार आहेत. रत्नागिरी हे जिल्हा राजधानीचे ठिकाण, तर चिपळूण हे जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींचे मुख्य ठिकाण असल्याने या दोन्ही ब वर्ग नगर परिषदा ताब्यात असणे राजकीय पक्षांना महत्त्वाचे वाटते आहे. खेड नगर परिषदेत गेल्या पाच वर्षात मनसेची एकहाती सत्ता होती. सेनेचे मंत्री रामदास कदम यांचा हा राजकीय गड मानला जातो. मात्र, गेल्यावेळी हातून निसटलेला हा गड यावेळी मनसेकडून काबीज करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या जाहीर सभांनी वातावरण ढवळून निघणार आहे. आरोप - प्रत्यारोपांचे फटाके फुटणार आहेत. चार नगर परिषदा व एका नगर पंचायतीची निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव उतरणार प्रचार रिंगणात. विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्याची शक्यता. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या जाहीर सभांनी वातावरण ढवळून निघणार. नगर परिषदांच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २० नोव्हेंबरला रत्नागिरीत येत आहेत. त्यांची जाहीर प्रचार सभा शहरातील प्रमोद महाजन संकुल येथे होणार आहे. त्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडांगणावर भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रचार सभेला शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच संपूर्ण जिल्हाभरातील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत.