शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

जिल्ह्यातील सर्वच सायबर कॅफे बेकायदा

By admin | Updated: August 6, 2014 00:00 IST

परवान्यासाठी डीडी-५ या विशेष नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो.

रत्नागिरी : जिल्ह्यात ५० सायबर कॅफे कार्यरत असून, हे सर्व कॅफे बिगर परवाना असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. यापैकी एकाही सायबर कॅफे चालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक परवाना घेतलेला नसून, शासनाचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांंच्या मार्गदर्शनानुसार रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहर परिसरातील १० सायबर कॅफे चालकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. या दहाजणांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात सायबर कॅफेचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अलिकडे स्मार्ट फोनमुळे इंटरनेट घरोघरी उपलब्ध होत असल्याने सायबर कॅफेत जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. असे असले तरी जिल्ह्यात अद्यापही ५० सायबर कॅफे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे शॉप अ‍ॅक्टनुसार व्यवसाय परवाने असले तरी सायबर कायद्यानुसार अशा सायबर कॅफेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत परवाना घेणे आवश्यक आहे. परवान्यासाठी डीडी-५ या विशेष नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. मात्र, जिल्ह्यातील कार्यरत एकाही सायबर कॅफेकडून असा अधिकृत परवाना घेतला गेलेला नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिंंदे यांनी यापूर्वी सायबर शाखेत वरिष्ठ म्हणून काम केल्याने जिल्ह्यातील सायबर कॅफेंची माहिती घेतली. त्यावेळी जिल्ह्यात कोणाकडेही अधिकृत परवाना नाही, असे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पांडे, गुुन्हा अन्वेषणचे सुनील पवार यांच्या पथकाने सायबर कॅफेबाबत माहिती गोळा करून त्यानंतर रत्नागिरी शहर परिसरातील १० सायबर कॅफेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली व गुन्हे दाखल करण्यात आले. बेकायदा सायबर कॅफे चालविणाऱ्या या दहा जणांना न्यालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. झालेला दंड या कॅफे चालकांनी भरला आहे. (प्रतिनिधी)