शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

जिल्ह्यातील सर्वच सायबर कॅफे बेकायदा

By admin | Updated: August 6, 2014 00:00 IST

परवान्यासाठी डीडी-५ या विशेष नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो.

रत्नागिरी : जिल्ह्यात ५० सायबर कॅफे कार्यरत असून, हे सर्व कॅफे बिगर परवाना असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. यापैकी एकाही सायबर कॅफे चालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक परवाना घेतलेला नसून, शासनाचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांंच्या मार्गदर्शनानुसार रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहर परिसरातील १० सायबर कॅफे चालकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. या दहाजणांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात सायबर कॅफेचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अलिकडे स्मार्ट फोनमुळे इंटरनेट घरोघरी उपलब्ध होत असल्याने सायबर कॅफेत जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. असे असले तरी जिल्ह्यात अद्यापही ५० सायबर कॅफे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे शॉप अ‍ॅक्टनुसार व्यवसाय परवाने असले तरी सायबर कायद्यानुसार अशा सायबर कॅफेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत परवाना घेणे आवश्यक आहे. परवान्यासाठी डीडी-५ या विशेष नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. मात्र, जिल्ह्यातील कार्यरत एकाही सायबर कॅफेकडून असा अधिकृत परवाना घेतला गेलेला नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिंंदे यांनी यापूर्वी सायबर शाखेत वरिष्ठ म्हणून काम केल्याने जिल्ह्यातील सायबर कॅफेंची माहिती घेतली. त्यावेळी जिल्ह्यात कोणाकडेही अधिकृत परवाना नाही, असे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पांडे, गुुन्हा अन्वेषणचे सुनील पवार यांच्या पथकाने सायबर कॅफेबाबत माहिती गोळा करून त्यानंतर रत्नागिरी शहर परिसरातील १० सायबर कॅफेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली व गुन्हे दाखल करण्यात आले. बेकायदा सायबर कॅफे चालविणाऱ्या या दहा जणांना न्यालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. झालेला दंड या कॅफे चालकांनी भरला आहे. (प्रतिनिधी)