शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

गणेशाेत्सव काळात ग्राम कृती दलावर सारा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

अडरे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाकाळ आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता प्रशासनाने पूर्ण दक्षता ...

अडरे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाकाळ आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता प्रशासनाने पूर्ण दक्षता घेत तयारी केली आहे. त्यासाठी प्रत्येक तपासणी नाका, एस. टी. बसस्थानक, रेल्वे स्थानक याठिकाणी आरोग्य व प्रशासकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच स्थानिक पातळीवर ग्राम कृती दल कार्यरत करण्यात आले असून, त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

यावर्षी निर्बंधांत काही प्रमाणात अधिक शिथिलता असल्याने चाकरमान्यांची संख्या वाढणार आहे. गणेशाेत्सवाआधी सुमारे चार ते पाच दिवस चाकरमान्यांचे आगमन सुरू होते. त्यानुसार शनिवारपासून कोकणात चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे. त्यासाठी प्रशासनही पूर्णतः सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. काेकणात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी नाक्यावर माहिती घेतली जाणार आहे. त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर, गावातील नातेवाईकांचे मोबाईल नंबर, संबंधित ग्रामपंचायत, त्याचबरोबर लसीकरण, कोरोना चाचणी अहवाल ही सर्व माहिती येथे घेतली जाणार आहे. ही माहिती त्याचदिवशी जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठवली जाणार असून, तेथून थेट तालुकास्तरावर आरोग्य विभाग तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली जाणार आहे. तेथून पुढे स्थानिक पातळीवर ग्राम कृती दलाकडे ही माहिती दिली जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्याला ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास तातडीने तपासणी करून कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्यास विलगीकरण व कोरोनाबाधित असल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क ही सर्व जबाबदारी ग्राम कृती दलाकडे राहणार आहे. तसेच गावात येणाऱ्या चाकरमान्यांची नोंददेखील ग्राम कृती दलाकडे राहणार आहे. तपासणी नाका तसेच एस. टी. बसस्थानक व रेल्वे स्थानक येथे आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, प्राथमिक चाचणी व आवश्यक वाटल्यास अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्हा प्रशासन ते थेट स्थानिक ग्रामस्थ अशी साखळी निर्माण करून चाकरमानी, प्रवाशांची काळजी घेतानाच गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा व कोरोनाला रोखण्यात यश मिळावे, या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ------------------------

चार ठिकाणी तपासणी नाके

कोकणात प्रवेश करण्यासाठी कशेडी, कुंभार्ली, मुर्शी आणि खारेपाटण अशी चार प्रवेशद्वार आहेत. या चारही ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे पेंडॉल उभारण्यात आले आहेत. येथे आरोग्य, महसूल, आणि पोलीस असे पथक तैनात करण्यात आले आहे.