शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

लाॅकडाऊनमध्ये दारू मिळेना, दुकाने बंदमुळे विक्रीही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षीपासून काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम दारू विक्रीवरही झाला. बंद दुकानांमुळे तळीरामांचे ...

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गतवर्षीपासून काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम दारू विक्रीवरही झाला. बंद दुकानांमुळे तळीरामांचे घसे काेरडेच राहिले. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील देशीच्या विक्रीत १२ टक्के, विदेशीच्या ६ टक्के, तर बिअरच्या विक्रीत ९ टक्के इतकी घट झाली आहे. वर्षभरात तब्बल ८,५८,३३,७९९ लिटर दारूची विक्री घटली आहे.

दारूचीही दुकाने बंद ठेवण्यात आल्याने तळीरामांची अडचण झाली हाेती. अनेकांनी घरात आधी ठेवलेल्या मद्याचे घाेट रिचवत लाॅकडाऊन संपण्याची वाट पाहिली, तर काहींनी लाॅकडाऊन जाहीर हाेताच घरात ‘स्टाॅक’ करून ठेवत लाॅकडाऊन संपेपर्यंत ‘पेग’ मारले. पण, अनेकांना एक घाेटही रिचवता आला नाही.

जिल्ह्यात २०१९ - २० मध्ये एकूण ९,४४,४५,३९४ लिटर दारूची विक्री झाली हाेती; तर २०-२१ मध्ये ८६,११,५९५ लिटर इतकीच विक्री झाली आहे. २०१९-२० या वर्षात देशी दारूची २५,८०,९२८ लिटर इतकी विक्री झाली, तर २०२०-२१ मध्ये २२,७४,७०१ लिटर इतकी विक्री झाली. विदेशीची २०१९-२० मध्ये २५,७४,०६२ लिटर, तर २०२०-२०२१ मध्ये २४,३०,६२४ लिटर इतकी विक्री झाली. बिअरच्या विक्रीतही घट हाेऊन ४२,९०,४०४ लिटरवरून ३९,०६,२७० लिटरवर येऊन पाेहोचली. मात्र, या कालावधीत वाईनच्या विक्रीत २८ टक्क्यांनी वाढ झाली.

महसूलला दारूचा आधार!

- दारूच्या विक्रीतून मिळणारा महसूल माेठ्या प्रमाणात आहे. मात्र, या व्यवसायामध्ये जेथे दारूची निर्मिती हाेते, तेथेच महसूल मिळताे. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ एकच देशी दारू निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यातून १९-२० मध्ये ४,९६,६६,४२२ रुपये, तर २०-२१ मध्ये ४,९३,१२,३३८ रुपये इतका महसूल मिळाला.

चार काेटींचा माल जप्त

- राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात एकूण २,८९४ इतके गुन्हे दाखल केले. या कारवाईत ४,२९,८९,४२२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

- गाेवा बनावटीच्या दारूची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत असल्याने त्याकडे लक्ष ठेवण्यात आले हाेते. वर्षभरात ९,९१२ लिटर गाेवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.

- लाॅकडाऊनमध्ये देशी, विदेशी आणि बिअरच्या विक्रीत घट झाली असली, तरी वाईनच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली हाेती. अनेकांनी वाईनची खरेदी करण्यावर भर दिला हाेता.

२०१९-२० मध्ये वाईनची ६०,९९७ लिटर इतकी विक्री झाली हाेती. हीच विक्री २०२०-२१ मध्ये ७८,११७ लिटर इतकी झाली हाेती.

- देशी, विदेशी आणि बिअरच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळते; पण ही विक्री कमी झाल्याने व्यावसायिकांचा ताेटा झाला.

सध्या दारूची दुकाने अंशत: सुरू आहेत. दुकाने उघडी नसल्याने अनेकजण हातभट्टी दारूचा आधार घेतात. ही दारू आराेग्यास हानीकारक आहे. त्यामुळे हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची माेहीम राबवण्यात येत आहे. याबाबत काेणाला माहिती मिळाल्यास नक्की द्यावी.

- व्ही. व्ही. वैद्य, प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क