शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भात नुकसानाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

गुहागरातील प्रकार : परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ओढवले संकट

असगोली : गुहागर तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपल्याकडे कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानाची नोंद केलेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आम्ही कार्यालयात बसून वाट पाहात आहोत, असे येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने कृषी विभागाच्या या अजब कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. वर्षभर शेतामध्ये राबायचे आणि जेव्हा शेतीचे उत्पन्न येते त्यावेळी ऐन पावसाने हातचे पीक हिरावून न्यायचे, अशी स्थिती सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. तयार झालेली भातशेती पावसामुळे जमिनीवर पडली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले शेत भिजल्याने नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. काही भातशेतीची कापणी झाली असली तरी महान जातीच्या शेतीची कापणी सुरू आहे. नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचा कोणीतरी येईल, अशी वाट पाहून अखेर नुकसान होऊ नये, म्हणून जे मिळेल ते आपले असे म्हणत कापणीला लागलेल्या शेतकऱ्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे. मात्र, तालुका कृषी कार्यालयात बसून नुकसानग्रस्त शेतकरी आपले नुकसान झाले आहे, अशी विनंती करीत येईल आणि त्यानंतर त्याच्या शेताचा सर्वे करुन शासनाकडे अहवाल पाठवू, असे नियोजन करून अधिकारी व कृषी सहाय्यक कार्यालयात बसून शेतकऱ्यांची वाट पाहत आहेत. मात्र, या अजब कारभारामुळे शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग की कृषी विभागासाठी शेतकरी? असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर भातशेती आहे. त्यापैकी १२०० हेक्टर महान भातशेती कापणी शिल्लक आहे. एकूण कापणी शिल्लक असलेल्या भातशेतीपैकी ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाले तरच शासन शेतकऱ्यांना भातशेती नुकसानभरपाई देते. मात्र, पाऊस पडून दोन दिवस झाले तरी कोणत्याही कृषी सहाय्यकाला एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये डोकावून पाहण्यास वेळ नाही. ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्या भागातील शेतीची तेथील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाने पाहणी करुन कार्यालयाकडे अहवाल देणे बंधनकारक आहे. मात्र, असे कोणतेच चित्र तालुक्यात पाहावयास मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात भातशेतीच्या झालेल्या नुकसानाची माहिती मागविली असताना तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभाग यापैकी कोणालाही नुकसानाची माहिती देता आली नाही. (वार्ताहर)