शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

कृषी विकास अडकला कागदावर!

By admin | Updated: October 23, 2014 22:51 IST

रिक्त पदे : शासन अजूनही गंभीर नसल्याचेच चित्र

रहिम दलाल -रत्नागिरी -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जिल्ह्यात ३०२ पदे रिक्त आहेत़ एवढ्या मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांचा परिणाम विकासकामांवर होत असल्याने कृषी विकासाचे तीन-तेरा वाजले आहेत़ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये आता महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजेच पाणलोट कार्यक्रम़ यामध्ये समुद्राच्या पाण्यापासून जमीन नापीक होऊ नये, यासाठी बंधारे उभारण्यात येत आहेत़ त्यासाठी लागणारे तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या कामांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी असतानाही ही कामे होत नसल्याची ओरड होत आहे़ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या विभागामध्ये जिल्ह्यासाठी ७८४ पदे मंजूर असून, ४८२ पदे भरलेली आहेत़ आतापर्यंत ३०२ एवढी कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांमध्ये गट अ - तंत्र अधिकारी ३ पदे, तालुका कृषी अधिकारी २ पदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, मृद व सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, मोहीम अधिकारी प्रत्येकी १ पद़ गट ब - कृषी अधिकारी ८ पदे, मंडल कृषी अधिकारी ११ पदे अद्याप रिक्तच आहेत.गट ब (क) - कृषी अधिकारी १४, कृषी सहाय्यक ११४ पदे, अधीक्षक २ पदे, सहाय्यक अधीक्षक ३, वरिष्ठ लिपिक ९ पदे, लिपिक २५ पदे, लघुलेखक, लघुटंकलेखक प्रत्येकी १ पद, अनुरेखक ४३ पदे, वाहन चालक- १० पदे़ गट ड- शिपाई - पहारेकरी २६, रोपमळा मदतनीस १५ पदे, गे्रड वन मजूर १० पदे, टिलर आॅपरेटर १ पद या पदांचा समावेश आहे़ गट अ मध्ये सहापैकी एकही पद रिक्त नाही़ गट ब मध्ये २२ पैकी १३ पदे भरलेली असून, ९ पदे रिक्त आहेत़ गट ब (क) मध्येही ४४ पैकी २१ पदे रिक्त असून, २३ पदे भरण्यात आली आहेत़ तर गट क मध्ये ५९८ पदांपैकी ३७६ पदे भरलेली असून, २२२ एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे भरण्याची आवश्यकता आहे़ गट ड मध्येही ११८ पदांपैकी केवळ ६६ पदे भरण्यात आली असून, ५२ पदे भरावयाची आहेत़़ एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदभरतीसाठी कृषी अधीक्षक कार्यालयाकडून वेळोवेळी विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे यांच्याशी पाठपुरावा करण्यात आलेला आहे़ मात्र, तरीही शासनाकडून त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ एकीकडे कृषी विकासाचे धोरण देशभरात राबवत असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त ठेवण्यात आल्याने जिल्ह्याचा कृषी विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ निद्रिस्त शासनग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या जिल्ह्यात कृषी सहाय्यकांची ११४ पदे रिक्त आहेत़ ही पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त असल्याने त्यांच्या भरतीसाठी कृषी सहाय्यकांकडून अनेकदा आंदोलने करण्यात आली़, तरी अद्याप शासनाला जाग आलेली नाही.