शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कृषी विकास अडकला कागदावर!

By admin | Updated: October 23, 2014 22:51 IST

रिक्त पदे : शासन अजूनही गंभीर नसल्याचेच चित्र

रहिम दलाल -रत्नागिरी -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जिल्ह्यात ३०२ पदे रिक्त आहेत़ एवढ्या मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांचा परिणाम विकासकामांवर होत असल्याने कृषी विकासाचे तीन-तेरा वाजले आहेत़ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये आता महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजेच पाणलोट कार्यक्रम़ यामध्ये समुद्राच्या पाण्यापासून जमीन नापीक होऊ नये, यासाठी बंधारे उभारण्यात येत आहेत़ त्यासाठी लागणारे तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या कामांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी असतानाही ही कामे होत नसल्याची ओरड होत आहे़ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या विभागामध्ये जिल्ह्यासाठी ७८४ पदे मंजूर असून, ४८२ पदे भरलेली आहेत़ आतापर्यंत ३०२ एवढी कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांमध्ये गट अ - तंत्र अधिकारी ३ पदे, तालुका कृषी अधिकारी २ पदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, मृद व सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, मोहीम अधिकारी प्रत्येकी १ पद़ गट ब - कृषी अधिकारी ८ पदे, मंडल कृषी अधिकारी ११ पदे अद्याप रिक्तच आहेत.गट ब (क) - कृषी अधिकारी १४, कृषी सहाय्यक ११४ पदे, अधीक्षक २ पदे, सहाय्यक अधीक्षक ३, वरिष्ठ लिपिक ९ पदे, लिपिक २५ पदे, लघुलेखक, लघुटंकलेखक प्रत्येकी १ पद, अनुरेखक ४३ पदे, वाहन चालक- १० पदे़ गट ड- शिपाई - पहारेकरी २६, रोपमळा मदतनीस १५ पदे, गे्रड वन मजूर १० पदे, टिलर आॅपरेटर १ पद या पदांचा समावेश आहे़ गट अ मध्ये सहापैकी एकही पद रिक्त नाही़ गट ब मध्ये २२ पैकी १३ पदे भरलेली असून, ९ पदे रिक्त आहेत़ गट ब (क) मध्येही ४४ पैकी २१ पदे रिक्त असून, २३ पदे भरण्यात आली आहेत़ तर गट क मध्ये ५९८ पदांपैकी ३७६ पदे भरलेली असून, २२२ एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे भरण्याची आवश्यकता आहे़ गट ड मध्येही ११८ पदांपैकी केवळ ६६ पदे भरण्यात आली असून, ५२ पदे भरावयाची आहेत़़ एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदभरतीसाठी कृषी अधीक्षक कार्यालयाकडून वेळोवेळी विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे यांच्याशी पाठपुरावा करण्यात आलेला आहे़ मात्र, तरीही शासनाकडून त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ एकीकडे कृषी विकासाचे धोरण देशभरात राबवत असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त ठेवण्यात आल्याने जिल्ह्याचा कृषी विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ निद्रिस्त शासनग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या जिल्ह्यात कृषी सहाय्यकांची ११४ पदे रिक्त आहेत़ ही पदे कित्येक महिन्यांपासून रिक्त असल्याने त्यांच्या भरतीसाठी कृषी सहाय्यकांकडून अनेकदा आंदोलने करण्यात आली़, तरी अद्याप शासनाला जाग आलेली नाही.