शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कृ षी उत्पन्न बाजार समितीत चलबिचल सुरु

By admin | Updated: November 9, 2014 23:33 IST

अद्याप बाजार समितीपर्यंत आला नसल्याची माहिती सचिव किरण महाजन यांनी दिली.

रत्नागिरी : राज्यातील मुदत संपलेल्या १०० कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन राज्य शासनाने निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत चलबिचल सुरु झाली आहे. मात्र, याबाबतचा कोणताही आदेश अद्याप बाजार समितीपर्यंत आला नसल्याची माहिती सचिव किरण महाजन यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० सप्टेंबर २००८ रोजी झाली होती. या निवडणुकीला ५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. नियमानुसार २०१३ साली बाजार समितीची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर राज्यात दुष्काळ पडल्याने व सहकार कायद्यातील घटना दुरुस्तीचे कारण पुढे करुन २० एप्रिल २०१२ पासून सहकार क्षेत्रातील निवडणुका ठप्प झाल्या होत्या.शासनाने नुकताच या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामुळे सहकार क्षेत्राला राजकीय आखाड्याचे स्वरुप येणार आहे. जिल्ह्यातील ८१९ संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत होणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचाही त्यामध्ये समावेश आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही चलबिचल सुरु झाली असून, या समितीबाबत पणन संचालकांनी माहिती मागवली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे ही माहिती पणन संचालकांना पाठवली असून, लवकरच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पुढील आदेश प्राप्त होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)