शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

प्रयत्नाने साकारलेली चित्रे दोन वर्षांनी पुसट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:05 IST

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त तेरा दिवस अथक कुंचल्यातून प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे दोन वर्षानंतर पुसट होऊ लागली आहेत. आतापर्यंत जाहिरातींचे फलक असलेली ही चित्रं आता पावसाळा सुरू असल्याने गवत तसेच झाडीमुळे झाकोळली गेली आहेत. त्यांच्या जतनासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत या कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या आठवणीही विरणार

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त तेरा दिवस अथक कुंचल्यातून प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे दोन वर्षानंतर पुसट होऊ लागली आहेत. आतापर्यंत जाहिरातींचे फलक असलेली ही चित्रं आता पावसाळा सुरू असल्याने गवत तसेच झाडीमुळे झाकोळली गेली आहेत. त्यांच्या जतनासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत या कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

रत्नागिरीत २ ते ४ मे २०१५ या कालावधीत पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पर्र्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच पर्यटकांना जिल्ह्याच्या विविध वैशिष्ट्यांची तसेच लोककला, लोकजीवनाची माहिती व्हावी यासाठी येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर तब्बल २८ चित्रे रेखाटण्यात आली होती. सावर्डे येथील सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट आणि देवरूख येथील डी-कॅड या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग १३ दिवस अथक प्रयत्न करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्युरल पेंटिंगच्या तंत्राने आकर्षक चित्रांनी या भिंंती रंगवल्या होत्या. जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगा आणि समुद्रकिनाºयांचे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा लाभलेले गड-किल्ले, मंदिरे, कोकणातील पारंपरिक लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती, पक्षी, प्राणी, जलचर यांचे जीवन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या (३५० फूट बाय ६ फूट) भव्य अशा नवीन संरक्षक भिंंतीवर आकर्षकरित्या चित्रबद्ध केले होते.

पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी चितारलेली ही चित्रं काही दिवसांतच दुर्लक्षित होऊ लागली. त्यावर थोड्याच दिवसांत कार्यक्रमांची पोस्टर्स, जाहिरातीचे फलक झळकू लागले. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्र दिवस - रात्र जागून तेरा दिवसांत साकारली ते प्रसिद्ध चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी या विविध कला जतनाची जबाबदारी येथील विविध कंपन्यांकडे द्यावी, असा मानस व्यक्त केला होता. मात्र, त्याबाबतची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हजारो रूपयांचा खर्च आणि त्यासाठी चित्रकारांनी घेतलेली मेहनत ही कवडीमोल ठरलेली आहे. यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी प्रयत्न करून या चित्रांचे संवर्धन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरीत मे २०१५मध्ये झालेल्या तीन दिवसांच्या महोत्सव कालावधीत जिल्ह्याची माहिती येणाºया पर्यटकांना व्हावी, यासाठी कलाकारांनी दिवस-रात्र एक करून काढलेली चित्र आज पुसट होत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. प्रशासनाचे यासाठी लाखो रूपये खर्च झाले असल्याने अजूनही या चित्रांच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत.- प्रा. प्रकाश राजेशिर्के,चित्रकार, सावर्डे