शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

प्रयत्नाने साकारलेली चित्रे दोन वर्षांनी पुसट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:05 IST

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त तेरा दिवस अथक कुंचल्यातून प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे दोन वर्षानंतर पुसट होऊ लागली आहेत. आतापर्यंत जाहिरातींचे फलक असलेली ही चित्रं आता पावसाळा सुरू असल्याने गवत तसेच झाडीमुळे झाकोळली गेली आहेत. त्यांच्या जतनासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत या कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या आठवणीही विरणार

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त तेरा दिवस अथक कुंचल्यातून प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे दोन वर्षानंतर पुसट होऊ लागली आहेत. आतापर्यंत जाहिरातींचे फलक असलेली ही चित्रं आता पावसाळा सुरू असल्याने गवत तसेच झाडीमुळे झाकोळली गेली आहेत. त्यांच्या जतनासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत या कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

रत्नागिरीत २ ते ४ मे २०१५ या कालावधीत पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पर्र्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच पर्यटकांना जिल्ह्याच्या विविध वैशिष्ट्यांची तसेच लोककला, लोकजीवनाची माहिती व्हावी यासाठी येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर तब्बल २८ चित्रे रेखाटण्यात आली होती. सावर्डे येथील सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट आणि देवरूख येथील डी-कॅड या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग १३ दिवस अथक प्रयत्न करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्युरल पेंटिंगच्या तंत्राने आकर्षक चित्रांनी या भिंंती रंगवल्या होत्या. जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगा आणि समुद्रकिनाºयांचे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा लाभलेले गड-किल्ले, मंदिरे, कोकणातील पारंपरिक लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती, पक्षी, प्राणी, जलचर यांचे जीवन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या (३५० फूट बाय ६ फूट) भव्य अशा नवीन संरक्षक भिंंतीवर आकर्षकरित्या चित्रबद्ध केले होते.

पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी चितारलेली ही चित्रं काही दिवसांतच दुर्लक्षित होऊ लागली. त्यावर थोड्याच दिवसांत कार्यक्रमांची पोस्टर्स, जाहिरातीचे फलक झळकू लागले. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्र दिवस - रात्र जागून तेरा दिवसांत साकारली ते प्रसिद्ध चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी या विविध कला जतनाची जबाबदारी येथील विविध कंपन्यांकडे द्यावी, असा मानस व्यक्त केला होता. मात्र, त्याबाबतची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हजारो रूपयांचा खर्च आणि त्यासाठी चित्रकारांनी घेतलेली मेहनत ही कवडीमोल ठरलेली आहे. यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी प्रयत्न करून या चित्रांचे संवर्धन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरीत मे २०१५मध्ये झालेल्या तीन दिवसांच्या महोत्सव कालावधीत जिल्ह्याची माहिती येणाºया पर्यटकांना व्हावी, यासाठी कलाकारांनी दिवस-रात्र एक करून काढलेली चित्र आज पुसट होत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. प्रशासनाचे यासाठी लाखो रूपये खर्च झाले असल्याने अजूनही या चित्रांच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत.- प्रा. प्रकाश राजेशिर्के,चित्रकार, सावर्डे