शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

प्रयत्नाने साकारलेली चित्रे दोन वर्षांनी पुसट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:05 IST

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त तेरा दिवस अथक कुंचल्यातून प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे दोन वर्षानंतर पुसट होऊ लागली आहेत. आतापर्यंत जाहिरातींचे फलक असलेली ही चित्रं आता पावसाळा सुरू असल्याने गवत तसेच झाडीमुळे झाकोळली गेली आहेत. त्यांच्या जतनासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत या कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या आठवणीही विरणार

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त तेरा दिवस अथक कुंचल्यातून प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे दोन वर्षानंतर पुसट होऊ लागली आहेत. आतापर्यंत जाहिरातींचे फलक असलेली ही चित्रं आता पावसाळा सुरू असल्याने गवत तसेच झाडीमुळे झाकोळली गेली आहेत. त्यांच्या जतनासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत या कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

रत्नागिरीत २ ते ४ मे २०१५ या कालावधीत पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पर्र्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच पर्यटकांना जिल्ह्याच्या विविध वैशिष्ट्यांची तसेच लोककला, लोकजीवनाची माहिती व्हावी यासाठी येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर तब्बल २८ चित्रे रेखाटण्यात आली होती. सावर्डे येथील सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट आणि देवरूख येथील डी-कॅड या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग १३ दिवस अथक प्रयत्न करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्युरल पेंटिंगच्या तंत्राने आकर्षक चित्रांनी या भिंंती रंगवल्या होत्या. जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगा आणि समुद्रकिनाºयांचे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा लाभलेले गड-किल्ले, मंदिरे, कोकणातील पारंपरिक लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती, पक्षी, प्राणी, जलचर यांचे जीवन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या (३५० फूट बाय ६ फूट) भव्य अशा नवीन संरक्षक भिंंतीवर आकर्षकरित्या चित्रबद्ध केले होते.

पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी चितारलेली ही चित्रं काही दिवसांतच दुर्लक्षित होऊ लागली. त्यावर थोड्याच दिवसांत कार्यक्रमांची पोस्टर्स, जाहिरातीचे फलक झळकू लागले. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्र दिवस - रात्र जागून तेरा दिवसांत साकारली ते प्रसिद्ध चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी या विविध कला जतनाची जबाबदारी येथील विविध कंपन्यांकडे द्यावी, असा मानस व्यक्त केला होता. मात्र, त्याबाबतची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हजारो रूपयांचा खर्च आणि त्यासाठी चित्रकारांनी घेतलेली मेहनत ही कवडीमोल ठरलेली आहे. यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी प्रयत्न करून या चित्रांचे संवर्धन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरीत मे २०१५मध्ये झालेल्या तीन दिवसांच्या महोत्सव कालावधीत जिल्ह्याची माहिती येणाºया पर्यटकांना व्हावी, यासाठी कलाकारांनी दिवस-रात्र एक करून काढलेली चित्र आज पुसट होत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. प्रशासनाचे यासाठी लाखो रूपये खर्च झाले असल्याने अजूनही या चित्रांच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत.- प्रा. प्रकाश राजेशिर्के,चित्रकार, सावर्डे