शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

सुमारे ८७०० किलाेमीटरचा प्रवास करून प्रणाली पाेहाेचली रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती व सायकलिंगचा प्रचार करण्यासाठी ती भ्रमंतीला बाहेर पडली आहे. सुमारे ८,७०० किलोमीटरचा प्रवास करून प्रणाली रत्नागिरीत पाेहाेचली आहे. तिथून पुढे सिंधुदुर्ग व कोल्हापूरमार्गे ती परत आपल्या गावी जाणार आहे.

अवघ्या २१ वर्षीय प्रणालीने समाजकार्यातील पदवी मिळवली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील शेती करत असून, तिला दोन बहिणी आहेत. सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण व ऋतूचक्र बदलातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या व शेतीच्या समस्या या जाणिवेतून आणि कोरोना महामारीत प्रत्यक्ष पर्यावरण ऱ्हास हीच शिकवण या गोष्टींमुळे प्रणालीने सायकलवरुन महाराष्ट्र भ्रमंती करण्याचा उपक्रम हाती घेतला.

कुठल्या शासकीय किंवा खासगी संस्थेतर्फे तिने हा प्रवास सुरू केलेला नाही. ना प्रवासासाठी कोणाची स्पॉन्सरशिप आहे. तिने स्वजबाबदारीवर हा प्रवास सुरू केला आहे. लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक मदतसुद्धा लोकच करतात. ७ महिने झाले प्रवासाला, ८,७०० किलोमीटरचा प्रवास झाला. या उपक्रमासाठी गंधार कुळकर्णी, राजा रेणू दांडेकर, दिलीप कुळकर्णी यांचे सहकार्य मिळाल्याचे प्रणालीने सांगितले.

---------------------

ती प्रवासात नेमके काय करते ?

सध्या सायकलने प्रवास करत ती आदिवासी, ग्रामीण, शहरी भागातील लोकांना व तरुणांना भेटते, त्यांच्याशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणांमध्ये भेट देऊन जनजागृती करणे व माहिती पोहोचविणे, शक्य झाले तर त्या-त्या लोकांशी बोलून समस्यांबाबत चर्चा करणे, आरोग्याबाबत जनजागृती व प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालविणे हा संदेश देते.

---------------

सरावासाठी दारोदार पेपर टाकले

प्रणाली लहानपणापासून सायकलिंग करते. या मोठ्या प्रवासासाठी तिने काही महिने सायकलवरुन पेपर टाकले आहेत. त्यातून सरावही झाला व पैसेही मिळाल्याचे प्रणालीने सांगितले.

-------------------

पाच संकल्प करण्याचे आवाहन

१) वायू, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य ती कामे सायकलने करुया.

२) प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळूया. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बाटली सोबत ठेवूया.

३) परिसरात झाडे लावूया व जगवूया. अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करुया.

४) आपला परिसर आपण स्वच्छ ठेवूया.

५) पाणी बचत व पाणी जिरवा यात सहभाग घेऊया.