शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सुमारे ८७०० किलाेमीटरचा प्रवास करून प्रणाली पाेहाेचली रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती व सायकलिंगचा प्रचार करण्यासाठी ती भ्रमंतीला बाहेर पडली आहे. सुमारे ८,७०० किलोमीटरचा प्रवास करून प्रणाली रत्नागिरीत पाेहाेचली आहे. तिथून पुढे सिंधुदुर्ग व कोल्हापूरमार्गे ती परत आपल्या गावी जाणार आहे.

अवघ्या २१ वर्षीय प्रणालीने समाजकार्यातील पदवी मिळवली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील शेती करत असून, तिला दोन बहिणी आहेत. सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण व ऋतूचक्र बदलातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या व शेतीच्या समस्या या जाणिवेतून आणि कोरोना महामारीत प्रत्यक्ष पर्यावरण ऱ्हास हीच शिकवण या गोष्टींमुळे प्रणालीने सायकलवरुन महाराष्ट्र भ्रमंती करण्याचा उपक्रम हाती घेतला.

कुठल्या शासकीय किंवा खासगी संस्थेतर्फे तिने हा प्रवास सुरू केलेला नाही. ना प्रवासासाठी कोणाची स्पॉन्सरशिप आहे. तिने स्वजबाबदारीवर हा प्रवास सुरू केला आहे. लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक मदतसुद्धा लोकच करतात. ७ महिने झाले प्रवासाला, ८,७०० किलोमीटरचा प्रवास झाला. या उपक्रमासाठी गंधार कुळकर्णी, राजा रेणू दांडेकर, दिलीप कुळकर्णी यांचे सहकार्य मिळाल्याचे प्रणालीने सांगितले.

---------------------

ती प्रवासात नेमके काय करते ?

सध्या सायकलने प्रवास करत ती आदिवासी, ग्रामीण, शहरी भागातील लोकांना व तरुणांना भेटते, त्यांच्याशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणांमध्ये भेट देऊन जनजागृती करणे व माहिती पोहोचविणे, शक्य झाले तर त्या-त्या लोकांशी बोलून समस्यांबाबत चर्चा करणे, आरोग्याबाबत जनजागृती व प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालविणे हा संदेश देते.

---------------

सरावासाठी दारोदार पेपर टाकले

प्रणाली लहानपणापासून सायकलिंग करते. या मोठ्या प्रवासासाठी तिने काही महिने सायकलवरुन पेपर टाकले आहेत. त्यातून सरावही झाला व पैसेही मिळाल्याचे प्रणालीने सांगितले.

-------------------

पाच संकल्प करण्याचे आवाहन

१) वायू, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य ती कामे सायकलने करुया.

२) प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळूया. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बाटली सोबत ठेवूया.

३) परिसरात झाडे लावूया व जगवूया. अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करुया.

४) आपला परिसर आपण स्वच्छ ठेवूया.

५) पाणी बचत व पाणी जिरवा यात सहभाग घेऊया.