शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

नाणारनंतर आता बारसू - सोलगाव भागातही अफवांचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

राजापूर : एखादा प्रकल्प येण्यापूर्वीच संघर्ष समिती स्थापन हाेत असते. नाणारमध्ये होऊ घातलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन ...

राजापूर : एखादा प्रकल्प येण्यापूर्वीच संघर्ष समिती स्थापन हाेत असते. नाणारमध्ये होऊ घातलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला घालवल्याचे नकारार्थी क्रेडिट घेत त्याचा आनंद घेत असलेल्या तालुक्यातील एका राजकीय गोटात पुन्हा हीच भावना जागृत झाली आहे. शून्य विस्थापन असल्याने बारसू - सोलगाव भागात रिफायनरी प्रकल्पाला पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते. या केवळ चर्चेनेच पुन्हा एकदा विशिष्ट लोकांना एकत्रित करीत संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या एकत्रीकरणासाठी ग्रामस्थांना आपली राहती घरेदारे सोडावी लागणार असल्याची मोठी अफवा सध्या चर्चेत आहे.

नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प तत्कालीन मंत्री अनंत गीते यांच्या खास प्रयत्नाने कोकणात आला होता. खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाची घोषणाही केली होती. मात्र, प्रकल्पाची अधिसूचना जाहीर करण्याची उद्योग खात्याने केलेली घाई प्रकल्पविरोधकांना लाभदायक ठरली होती. मे महिन्यात काढण्यात आलेली अधिसूचना आणि त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी रत्नागिरी रिफायनरी कंपनीची झालेली स्थापना यातील तफावतीचा कालावधी प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवण्यासाठी पुरेसा ठरला होता. मुळात या प्रकल्पाची जेव्हा शिवसेना खासदारांकडून घोषणा झाली, तेव्हा प्रकल्प भागातील ग्रामस्थांनी एकत्रित येत आमदार राजन साळवी यांच्याकरवी आपल्या २७ मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन दिले होते. याच कालावधीत इतर राजकीय पक्षही स्थानिक ग्रामस्थ प्रकल्पासोबत असल्याने त्यांच्यासोबत होते. मात्र, त्यानंतर प्रकल्प भागात एनजीओंचे आगमन झाले आणि त्यांनी राजकीय नेत्यांपेक्षा जनतेचा विश्वास संपादन करून स्थानिकांत प्रकल्पविरोधाचे विष पेरले.

तब्बल साडेआठ हजार एकरच्या जमीन मालकांनी प्रकल्पासाठी दिलेली संमतीपत्रे भाजपेतर एकाही राजकीय पक्षाने ढुंकून पाहिली नाहीत. सत्ताधारी शिवसेनेने तर आपल्याला तेथील चार-पाच ग्रामपंचायतींनी मतदान केले म्हणून देश, राज्य आणि कोकणसाठी फायदेशीर असलेला हा प्रकल्प होऊच शकत नाही, असा निर्धारच केला. बारसू-सोलगाव भागाच्या कातळपड पठारावर राहती घरेच नसल्याने शून्य विस्थापन असलेल्या या भागात प्रकल्प साकारू शकतो एवढ्या चर्चेनेच नाणारमध्ये रिफायनरीला विरोध करणारी काही मंडळी या भागातील विरोधासाठी सक्रिय झाली असल्याची चर्चा आहे. विस्थापन नसल्याने काँग्रेस, भाजप, मनसे, राष्ट्रवादी या पक्षांनी या ठिकाणी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेशी निगडित असलेल्या काही मंडळींनीच पुन्हा विशिष्ट लोकांना एकत्रित करीत आपली घरेदारे जाणार, अशी भीती पसरवण्यास सुरुवात केली आहे. अशा व्हिडीओ क्लिप्स ही मंडळी पाठवू लागल्याने हा हास्यास्पद विषय चर्चेचा झाला आहे. प्रकल्पाचे या भागात कोणतेच सूतोवाच नसताना या भागातील शिवसेनेचा एक सदा चर्चेत असलेला पदाधिकारी ही विरोधाची मोहीम चालवत असल्याने शिवसेनेचे खरे रूप कोणते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.