शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

नाणारनंतर आता बारसू - सोलगाव भागातही अफवांचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

राजापूर : एखादा प्रकल्प येण्यापूर्वीच संघर्ष समिती स्थापन हाेत असते. नाणारमध्ये होऊ घातलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन ...

राजापूर : एखादा प्रकल्प येण्यापूर्वीच संघर्ष समिती स्थापन हाेत असते. नाणारमध्ये होऊ घातलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला घालवल्याचे नकारार्थी क्रेडिट घेत त्याचा आनंद घेत असलेल्या तालुक्यातील एका राजकीय गोटात पुन्हा हीच भावना जागृत झाली आहे. शून्य विस्थापन असल्याने बारसू - सोलगाव भागात रिफायनरी प्रकल्पाला पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते. या केवळ चर्चेनेच पुन्हा एकदा विशिष्ट लोकांना एकत्रित करीत संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या एकत्रीकरणासाठी ग्रामस्थांना आपली राहती घरेदारे सोडावी लागणार असल्याची मोठी अफवा सध्या चर्चेत आहे.

नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प तत्कालीन मंत्री अनंत गीते यांच्या खास प्रयत्नाने कोकणात आला होता. खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाची घोषणाही केली होती. मात्र, प्रकल्पाची अधिसूचना जाहीर करण्याची उद्योग खात्याने केलेली घाई प्रकल्पविरोधकांना लाभदायक ठरली होती. मे महिन्यात काढण्यात आलेली अधिसूचना आणि त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी रत्नागिरी रिफायनरी कंपनीची झालेली स्थापना यातील तफावतीचा कालावधी प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवण्यासाठी पुरेसा ठरला होता. मुळात या प्रकल्पाची जेव्हा शिवसेना खासदारांकडून घोषणा झाली, तेव्हा प्रकल्प भागातील ग्रामस्थांनी एकत्रित येत आमदार राजन साळवी यांच्याकरवी आपल्या २७ मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन दिले होते. याच कालावधीत इतर राजकीय पक्षही स्थानिक ग्रामस्थ प्रकल्पासोबत असल्याने त्यांच्यासोबत होते. मात्र, त्यानंतर प्रकल्प भागात एनजीओंचे आगमन झाले आणि त्यांनी राजकीय नेत्यांपेक्षा जनतेचा विश्वास संपादन करून स्थानिकांत प्रकल्पविरोधाचे विष पेरले.

तब्बल साडेआठ हजार एकरच्या जमीन मालकांनी प्रकल्पासाठी दिलेली संमतीपत्रे भाजपेतर एकाही राजकीय पक्षाने ढुंकून पाहिली नाहीत. सत्ताधारी शिवसेनेने तर आपल्याला तेथील चार-पाच ग्रामपंचायतींनी मतदान केले म्हणून देश, राज्य आणि कोकणसाठी फायदेशीर असलेला हा प्रकल्प होऊच शकत नाही, असा निर्धारच केला. बारसू-सोलगाव भागाच्या कातळपड पठारावर राहती घरेच नसल्याने शून्य विस्थापन असलेल्या या भागात प्रकल्प साकारू शकतो एवढ्या चर्चेनेच नाणारमध्ये रिफायनरीला विरोध करणारी काही मंडळी या भागातील विरोधासाठी सक्रिय झाली असल्याची चर्चा आहे. विस्थापन नसल्याने काँग्रेस, भाजप, मनसे, राष्ट्रवादी या पक्षांनी या ठिकाणी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेशी निगडित असलेल्या काही मंडळींनीच पुन्हा विशिष्ट लोकांना एकत्रित करीत आपली घरेदारे जाणार, अशी भीती पसरवण्यास सुरुवात केली आहे. अशा व्हिडीओ क्लिप्स ही मंडळी पाठवू लागल्याने हा हास्यास्पद विषय चर्चेचा झाला आहे. प्रकल्पाचे या भागात कोणतेच सूतोवाच नसताना या भागातील शिवसेनेचा एक सदा चर्चेत असलेला पदाधिकारी ही विरोधाची मोहीम चालवत असल्याने शिवसेनेचे खरे रूप कोणते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.