शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

नाणारनंतर आता बारसू - सोलगाव भागातही अफवांचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

राजापूर : एखादा प्रकल्प येण्यापूर्वीच संघर्ष समिती स्थापन हाेत असते. नाणारमध्ये होऊ घातलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन ...

राजापूर : एखादा प्रकल्प येण्यापूर्वीच संघर्ष समिती स्थापन हाेत असते. नाणारमध्ये होऊ घातलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला घालवल्याचे नकारार्थी क्रेडिट घेत त्याचा आनंद घेत असलेल्या तालुक्यातील एका राजकीय गोटात पुन्हा हीच भावना जागृत झाली आहे. शून्य विस्थापन असल्याने बारसू - सोलगाव भागात रिफायनरी प्रकल्पाला पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते. या केवळ चर्चेनेच पुन्हा एकदा विशिष्ट लोकांना एकत्रित करीत संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या एकत्रीकरणासाठी ग्रामस्थांना आपली राहती घरेदारे सोडावी लागणार असल्याची मोठी अफवा सध्या चर्चेत आहे.

नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प तत्कालीन मंत्री अनंत गीते यांच्या खास प्रयत्नाने कोकणात आला होता. खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाची घोषणाही केली होती. मात्र, प्रकल्पाची अधिसूचना जाहीर करण्याची उद्योग खात्याने केलेली घाई प्रकल्पविरोधकांना लाभदायक ठरली होती. मे महिन्यात काढण्यात आलेली अधिसूचना आणि त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी रत्नागिरी रिफायनरी कंपनीची झालेली स्थापना यातील तफावतीचा कालावधी प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवण्यासाठी पुरेसा ठरला होता. मुळात या प्रकल्पाची जेव्हा शिवसेना खासदारांकडून घोषणा झाली, तेव्हा प्रकल्प भागातील ग्रामस्थांनी एकत्रित येत आमदार राजन साळवी यांच्याकरवी आपल्या २७ मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन दिले होते. याच कालावधीत इतर राजकीय पक्षही स्थानिक ग्रामस्थ प्रकल्पासोबत असल्याने त्यांच्यासोबत होते. मात्र, त्यानंतर प्रकल्प भागात एनजीओंचे आगमन झाले आणि त्यांनी राजकीय नेत्यांपेक्षा जनतेचा विश्वास संपादन करून स्थानिकांत प्रकल्पविरोधाचे विष पेरले.

तब्बल साडेआठ हजार एकरच्या जमीन मालकांनी प्रकल्पासाठी दिलेली संमतीपत्रे भाजपेतर एकाही राजकीय पक्षाने ढुंकून पाहिली नाहीत. सत्ताधारी शिवसेनेने तर आपल्याला तेथील चार-पाच ग्रामपंचायतींनी मतदान केले म्हणून देश, राज्य आणि कोकणसाठी फायदेशीर असलेला हा प्रकल्प होऊच शकत नाही, असा निर्धारच केला. बारसू-सोलगाव भागाच्या कातळपड पठारावर राहती घरेच नसल्याने शून्य विस्थापन असलेल्या या भागात प्रकल्प साकारू शकतो एवढ्या चर्चेनेच नाणारमध्ये रिफायनरीला विरोध करणारी काही मंडळी या भागातील विरोधासाठी सक्रिय झाली असल्याची चर्चा आहे. विस्थापन नसल्याने काँग्रेस, भाजप, मनसे, राष्ट्रवादी या पक्षांनी या ठिकाणी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेशी निगडित असलेल्या काही मंडळींनीच पुन्हा विशिष्ट लोकांना एकत्रित करीत आपली घरेदारे जाणार, अशी भीती पसरवण्यास सुरुवात केली आहे. अशा व्हिडीओ क्लिप्स ही मंडळी पाठवू लागल्याने हा हास्यास्पद विषय चर्चेचा झाला आहे. प्रकल्पाचे या भागात कोणतेच सूतोवाच नसताना या भागातील शिवसेनेचा एक सदा चर्चेत असलेला पदाधिकारी ही विरोधाची मोहीम चालवत असल्याने शिवसेनेचे खरे रूप कोणते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.