शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

तब्बल ४४ वर्षांनंतर वेरवलीतील क्षेत्र येणार सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST

लांजा : वेळेत निधी उपलब्ध होण्यात झालेला विलंब, कोरोना संकटामुळे निधीची कमतरता, कोकण रेल्वेची परवानगी मिळविण्यासाठी आलेल्या अडचणी आदी ...

लांजा : वेळेत निधी उपलब्ध होण्यात झालेला विलंब, कोरोना संकटामुळे निधीची कमतरता, कोकण रेल्वेची परवानगी मिळविण्यासाठी आलेल्या अडचणी आदी समस्यांवर मात करून, अखेर वेरवली बेर्डेवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम साडेसहा किलाेमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनंतर वेरवली येथील ३५० ते ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

लांजा तालुक्यातील वेरवली येथील बेर्डेवाडी धरणाच्या कामाला सन १९७७ मध्ये सुरुवात झाली होती. वेरवली गावातील १,०८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी या धरणाची निर्मिती करण्यात आली. मात्र, १९७७ला सुरुवात होऊनही आलेल्या विविध अडचणींमुळे हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. या धरण प्रकल्पाबाबत माहिती देताना, उपविभागीय अभियंता के.आर. पाडवी यांनी सांगितले की, प्रत्यक्ष सन १९७७च्या सुमाराला धरणाच्या कामाला सुरुवात झाली. या कामाला सुरुवात झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी आल्या. यामध्ये वेळेत निधी उपलब्ध न होणे, धरण प्रकल्पाजवळूनच कोकण रेल्वे जात असल्याने, कोकण रेल्वेची परवानगी मिळण्यात झालेला विलंब आणि या धरण प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमीन व झाडे, बागायतीचे मूल्यांकनासाठी येणारी अडचण आणि त्यानंतर गतवर्षीच्या वर्षापासून सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे आलेले संकट, यामुळे या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम रखडले होते.

आता धरणाच्या डाव्या कालव्याचे काम सहा किलाेमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे वेरवली गावातील साडेतीनशे ते चारशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याबरोबरच बंदिस्त असलेल्या उजव्या कालव्याचे पाइप टाकण्याचे कामही साडेसहा किलाेमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. या कालव्याच्या कामांमुळे वेरवली येथील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी येणार असल्याने, आता येथील शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येणे शक्‍य होणार आहे.