शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

तब्बल ३० वर्षांनंतर निवधेतील ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

देवरुख / सचिन मोहिते : संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावाला जोडणाऱ्या बावनदी साकवावरून धोकादायक परिस्थितीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची ...

देवरुख / सचिन मोहिते : संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावाला जोडणाऱ्या बावनदी साकवावरून धोकादायक परिस्थितीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आजपर्यंत येथील अबालवृद्धांवर होती. हे विदारक चित्र प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ही समस्याच कायमची दूर करण्याचा शब्द आमदार शेखर निकम यांनी तेथील ग्रामस्थांना निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यांनी निवधे पुलाचा प्रश्नच मार्गी लावत या पुलाकरिता तब्बल ४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर केले आहेत. या पुलामुळे सुमारे ३० वर्षे या लोखंडी साकवावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास थांबणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील निवधे गाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे १८००च्या घरात आहे. या गावाला जोडणाऱ्या बावनदीवर लोखंडी साकव आहे. मात्र, याची अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे. निवधे गावातून बामणोली, ओझरे, मारळ, मार्लेश्वर, आंगवली, देवरुख या ठिकाणी जाण्यासाठी रहदारी सुरू असते. गावातील लोक व मार्लेश्वरकरिता चालत येणारे भाविक या पुलाचा वापर करतात.

हा लोखंडी साकव जुना असून, तो अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल व्हावा, अशी ग्रामस्थ अनेक वर्षे मागणी करत होते. पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पावसाळ्यात बावनदीला मोठे पाणी आल्यानंतर पाणी या लोखंडी पुलाला लागत असते. बावनदीवरील लोखंडी साकवाचे काही भाग गंजल्याने सडले आहेत. त्यामुळे मोठ्या पुरात हा साकव वाहून जाण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत होती.

याठिकाणी पूल उभारावा, अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी हाेती. मात्र, त्याकडे आजवर दुर्लक्षच करण्यात आले. मात्र, निवडणुकीपूर्वी मतदार संघात फिरताना ही समस्या आमदार शेखर निकम यांनी पाहिली. त्याचवेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांना पुलाचा विषय मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आमदार निकम यांनी सीआरआयएफमधून बामणोली ते निवधे पुलासाठी तब्बल ४ कोटी ३२ लाख रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.