शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर असेल, तरच शिक्षण विभागात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामध्ये जाण्यासाठी प्रत्येक शिक्षकाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असल्याचे आदेश ...

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामध्ये जाण्यासाठी प्रत्येक शिक्षकाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असल्याचे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक नीशादेवी वाघमोडे यांनी नुकताच काढला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा सभेमध्ये दिलेल्या तोंडी सूचनेनुसार या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे या आदेशात नमूद आहे. शाळेत मात्र येणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजन पातळी पाहून प्रवेश दिला जातो आणि कार्यालयात मात्र प्रवेशासाठी आरटीपीसीआर बंधनकारक केली जाते, या विरोधाभासी निर्णयाची जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा परिषदेकडे शासकीय कामानिमित्त येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने शिक्षण विभागात येण्याचा आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक नीशादेवी वाघमोडे यांनी नुकताच काढला आहे. हा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी यांनी आढावा सभेमध्ये दिलेल्या सूचनांच्या काढला असल्याचे या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग शासनाच्या नियमांप्रमाणे सुरू आहेत. प्रत्येकदिवशी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देत असताना त्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाते व ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी तपासली जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जातो. शाळांमध्ये प्रवेशासाठी एवढेच निकष असताना शिक्षण विभागामध्ये जाण्यासाठी मात्र शिक्षकांना आरटी पीसीआर बंधनकारक केली जाते, हा विरोधाभास असल्याची चर्चा शाळांमध्ये सुरू आहे.

......................

कोट

अजून कितीवेळा टेस्ट करायची?

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील अनेक शिक्षकांना दोन ते तीनवेळा कोरोना चाचणी करावी लागली आहे. आता पुन्हा शिक्षण विभागात जाण्यासाठी आरटीपीसीआर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे केवळ शिक्षकांनाच कोरोना होतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका फेरीमध्ये शिक्षण विभागातील काम पूर्ण होईल का? तसे नाही झाले, तर प्रत्येक फेरीला आरटीपीसीआर करायची का? शिक्षण विभागाने या निर्णयाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

- सागर पाटील,

अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ