शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

राजापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींवर प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

राजापूर : एप्रिल २०२१ दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल, मे दरम्यान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले ...

राजापूर : एप्रिल २०२१ दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल, मे दरम्यान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले हाेते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये राजापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश असून, या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे २६ एप्रिलपासून या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे.

ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासकीय कामकाज सुरू केले होते. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. यामध्ये आंगले, भालावली, देवाचेगोठणे, केळवळी, मूर, राजवाडी, सागवे, वडदहसोळ, मोगरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ९ ग्रामपंचायतींवर शासनाच्या आदेशानुसार प्रशासक नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन सरपंच निवडीपर्यंत प्रशासकीय राजवट सुरू राहणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाल्याने येथील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली होती. मात्र, या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने राजकीय पक्षांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.