शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

राजापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींवर प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

राजापूर : एप्रिल २०२१ दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल, मे दरम्यान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले ...

राजापूर : एप्रिल २०२१ दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल, मे दरम्यान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले हाेते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये राजापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश असून, या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे २६ एप्रिलपासून या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे.

ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासकीय कामकाज सुरू केले होते. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. यामध्ये आंगले, भालावली, देवाचेगोठणे, केळवळी, मूर, राजवाडी, सागवे, वडदहसोळ, मोगरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ९ ग्रामपंचायतींवर शासनाच्या आदेशानुसार प्रशासक नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन सरपंच निवडीपर्यंत प्रशासकीय राजवट सुरू राहणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाल्याने येथील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली होती. मात्र, या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने राजकीय पक्षांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.