शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

पाणीटंचाईग्रस्त गावांना प्रशासनाचा दिलासा

By admin | Updated: May 14, 2016 23:49 IST

संगमेश्वर तालुका : संयुक्त पाहणी करून पाण्याची व्यवस्था...

देवरुख : दिवसेंदिवस पारा जसा वाढत आहे, तसतशी पाण्याची पातळीदेखील जलदगतीने घटत आहे. परिणामी संगमेश्वर तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये अजून वाढ होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘दुष्काळ दाह’ सदराखाली विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल संगमेश्वर तालुक्यातील प्रशासनाला घेतली आणि याबाबत तत्काळ संयुक्त पाहणी करुन मागणी असलेल्या गावांना पाण्याची व्यवस्था केली. ‘लोकमत’मध्ये ‘यंदा १५ दिवस आधीच पाणीटंचाई संगमेश्वरात हजारो तहानलेल्या जीवांना अवघे दोन टँकर’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पाणी टंचाईग्रस्त गावांची संयुक्त पाहणी तीन विभागांची असल्याने या प्रक्रियेला विलंब लागतो, असे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. याची दखल तालुका प्रशासनाने घेतली असून, नायब तहसीलदारांनी तत्काळ पाणीटंचाईबाबत अहवाल तयार करुन संयुक्त पाहणी केली आणि मुर्शीसह इतर गावांमध्ये टँकर सुरु करण्यात आला. प्रशासनाने लागलीच टँकर सुरु केल्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी तहसील, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाला धन्यवाद दिले असून, ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.संगमेश्वर तालुक्यामध्ये सध्या ११ गावे आणि १७ वाड्यांना २ शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आजपर्यंत टंचाईग्रस्त गावांना एकूण ७१ फेऱ्या टँकरच्या देण्यात आल्या आहेत. पाचांबे, पुर्येतर्फे देवळे, बेलारी बु., कनकाडी, शृंगारपूर, ओझरे खुर्द, मावळतवाडी, निवे खुर्द - चर्मकारवाडी, बौद्धवाडी, भडकंबा-बौद्धवाडी, तळवडे खाणचीवाडी, शेनवडे गवळवाडी, कुचांबे येडगेवाडी या ११ गावांतील १७ वाड्यांना दोन शासकीय टँकरने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)ग्रामस्थ त्रस्तसंगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीकच्या मुर्शी गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. याठिकाणी ग्रामस्थांना मैलोन्मैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. वाढत्या उष्म्यामुळे आणि त्यातच पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.