शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पूरप्रवण, दरडप्रवण वस्त्यांना प्रशासनाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

खेड : अतिवृष्टीचा इशारा असल्याने खेड तालुक्यातील अठरा गावांतील बाधित होण्याची शक्यता असलेल्या ८५८ कुटुंबांतील २ हजार ८६९ लोकांचे ...

खेड : अतिवृष्टीचा इशारा असल्याने खेड तालुक्यातील अठरा गावांतील बाधित होण्याची शक्यता असलेल्या ८५८ कुटुंबांतील २ हजार ८६९ लोकांचे स्थलांतरित होण्याच्या नोटीस महसूल प्रशासनाने दिल्या आहेत. या स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची तात्पुरत्या निवासाची सोय गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व काही ठिकाणी खासगी बंद घरात करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक १० ते १२ जून कालावधीत हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील अनेक गावांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. खेड तालुक्यातील अठरा गावांतील ८५८ कुटुंबांना पूर रेषेत येत असल्याने संभावित धोका ओळखून तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याच्या नोटीस तालुका प्रशासनाने दिल्या आहेत. तालुक्यातील खेड शहर, भोस्ते, आंजणी, मेटे, शिव बुद्रुक, शिव खुर्द, आष्टी मोहल्ला, आष्टी बुद्रुक, तुंबाड, बोरघर, पन्हाळजे, कर्जी, आमशेत, होडखाड, कोंडवाडी, अलसुरे, कर्जी, सुसेरी, चिंचघर, प्रभुवाडी या गावांमधील सुमारे साडेआठशे कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या गावांची पाहणी करायलादेखील सुरुवात केली आहे. पूरप्रवण क्षेत्र असलेल्या खेडमधील अलसुरे गावातील मोहल्ल्यात पाहणी केली असता, मोहल्ल्यातील ६ कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या गेल्या आहेत. या गावासह, चिंचघर, प्रभुवाडी, कर्जी, सुसेरी या गावातील लोकांनादेखील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या नोटीस प्रशासनाने दिल्या आहेत. त्यापैकी अलसुरे गावाला दरवेळी अतिवृष्टीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अतिवृष्टीत या गावाती कुटुंबांचा संपर्क तुटतो. यावर्षी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासनाने स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील जिल्हा परिषद शाळा आणि सुरक्षित अंतरावरील काही बंद घरांमध्ये ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था केली आहे. गावातील वृद्ध, नागरिक, लहान मुले आणि आजारी लोकांना प्राधान्याने स्थलांतरित करण्याची प्रक्रिया बुधवार, दि. ९ रोजी सुरू झाली होती.

---------------------

२००५ च्या कटू आठवणी

२००५ मध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत खेड तालुक्यातील अलसुरे गावातील मोहल्ल्याला पुराचा वेढा पडला होता. तब्ब्ल १५ दिवस येथील ग्रामस्थांसोबत संपर्क तुटला होता. जगबुडी नदीकिनारी असलेल्या या वस्तीत लोक एका मशिदीच्या छतावर इतके दिवस जीव वाचवण्यासाठी राहिले होते. त्यामुळे कधीही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला की, येथील ग्रामस्थांच्या त्या कटू आठवणी पुन्हा ताज्या होतात.

-----------------------------

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे खेड तालुक्यातील अलसुरे गावातील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे़