शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

पूरप्रवण, दरडप्रवण वस्त्यांना प्रशासनाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

खेड : अतिवृष्टीचा इशारा असल्याने खेड तालुक्यातील अठरा गावांतील बाधित होण्याची शक्यता असलेल्या ८५८ कुटुंबांतील २ हजार ८६९ लोकांचे ...

खेड : अतिवृष्टीचा इशारा असल्याने खेड तालुक्यातील अठरा गावांतील बाधित होण्याची शक्यता असलेल्या ८५८ कुटुंबांतील २ हजार ८६९ लोकांचे स्थलांतरित होण्याच्या नोटीस महसूल प्रशासनाने दिल्या आहेत. या स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची तात्पुरत्या निवासाची सोय गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व काही ठिकाणी खासगी बंद घरात करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक १० ते १२ जून कालावधीत हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील अनेक गावांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. खेड तालुक्यातील अठरा गावांतील ८५८ कुटुंबांना पूर रेषेत येत असल्याने संभावित धोका ओळखून तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याच्या नोटीस तालुका प्रशासनाने दिल्या आहेत. तालुक्यातील खेड शहर, भोस्ते, आंजणी, मेटे, शिव बुद्रुक, शिव खुर्द, आष्टी मोहल्ला, आष्टी बुद्रुक, तुंबाड, बोरघर, पन्हाळजे, कर्जी, आमशेत, होडखाड, कोंडवाडी, अलसुरे, कर्जी, सुसेरी, चिंचघर, प्रभुवाडी या गावांमधील सुमारे साडेआठशे कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या गावांची पाहणी करायलादेखील सुरुवात केली आहे. पूरप्रवण क्षेत्र असलेल्या खेडमधील अलसुरे गावातील मोहल्ल्यात पाहणी केली असता, मोहल्ल्यातील ६ कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या गेल्या आहेत. या गावासह, चिंचघर, प्रभुवाडी, कर्जी, सुसेरी या गावातील लोकांनादेखील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या नोटीस प्रशासनाने दिल्या आहेत. त्यापैकी अलसुरे गावाला दरवेळी अतिवृष्टीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अतिवृष्टीत या गावाती कुटुंबांचा संपर्क तुटतो. यावर्षी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासनाने स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील जिल्हा परिषद शाळा आणि सुरक्षित अंतरावरील काही बंद घरांमध्ये ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था केली आहे. गावातील वृद्ध, नागरिक, लहान मुले आणि आजारी लोकांना प्राधान्याने स्थलांतरित करण्याची प्रक्रिया बुधवार, दि. ९ रोजी सुरू झाली होती.

---------------------

२००५ च्या कटू आठवणी

२००५ मध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत खेड तालुक्यातील अलसुरे गावातील मोहल्ल्याला पुराचा वेढा पडला होता. तब्ब्ल १५ दिवस येथील ग्रामस्थांसोबत संपर्क तुटला होता. जगबुडी नदीकिनारी असलेल्या या वस्तीत लोक एका मशिदीच्या छतावर इतके दिवस जीव वाचवण्यासाठी राहिले होते. त्यामुळे कधीही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला की, येथील ग्रामस्थांच्या त्या कटू आठवणी पुन्हा ताज्या होतात.

-----------------------------

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे खेड तालुक्यातील अलसुरे गावातील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे़