शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

पूरप्रवण, दरडप्रवण वस्त्यांना प्रशासनाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

खेड : अतिवृष्टीचा इशारा असल्याने खेड तालुक्यातील अठरा गावांतील बाधित होण्याची शक्यता असलेल्या ८५८ कुटुंबांतील २ हजार ८६९ लोकांचे ...

खेड : अतिवृष्टीचा इशारा असल्याने खेड तालुक्यातील अठरा गावांतील बाधित होण्याची शक्यता असलेल्या ८५८ कुटुंबांतील २ हजार ८६९ लोकांचे स्थलांतरित होण्याच्या नोटीस महसूल प्रशासनाने दिल्या आहेत. या स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची तात्पुरत्या निवासाची सोय गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व काही ठिकाणी खासगी बंद घरात करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक १० ते १२ जून कालावधीत हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील अनेक गावांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. खेड तालुक्यातील अठरा गावांतील ८५८ कुटुंबांना पूर रेषेत येत असल्याने संभावित धोका ओळखून तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याच्या नोटीस तालुका प्रशासनाने दिल्या आहेत. तालुक्यातील खेड शहर, भोस्ते, आंजणी, मेटे, शिव बुद्रुक, शिव खुर्द, आष्टी मोहल्ला, आष्टी बुद्रुक, तुंबाड, बोरघर, पन्हाळजे, कर्जी, आमशेत, होडखाड, कोंडवाडी, अलसुरे, कर्जी, सुसेरी, चिंचघर, प्रभुवाडी या गावांमधील सुमारे साडेआठशे कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या गावांची पाहणी करायलादेखील सुरुवात केली आहे. पूरप्रवण क्षेत्र असलेल्या खेडमधील अलसुरे गावातील मोहल्ल्यात पाहणी केली असता, मोहल्ल्यातील ६ कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या गेल्या आहेत. या गावासह, चिंचघर, प्रभुवाडी, कर्जी, सुसेरी या गावातील लोकांनादेखील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या नोटीस प्रशासनाने दिल्या आहेत. त्यापैकी अलसुरे गावाला दरवेळी अतिवृष्टीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अतिवृष्टीत या गावाती कुटुंबांचा संपर्क तुटतो. यावर्षी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासनाने स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील जिल्हा परिषद शाळा आणि सुरक्षित अंतरावरील काही बंद घरांमध्ये ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था केली आहे. गावातील वृद्ध, नागरिक, लहान मुले आणि आजारी लोकांना प्राधान्याने स्थलांतरित करण्याची प्रक्रिया बुधवार, दि. ९ रोजी सुरू झाली होती.

---------------------

२००५ च्या कटू आठवणी

२००५ मध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत खेड तालुक्यातील अलसुरे गावातील मोहल्ल्याला पुराचा वेढा पडला होता. तब्ब्ल १५ दिवस येथील ग्रामस्थांसोबत संपर्क तुटला होता. जगबुडी नदीकिनारी असलेल्या या वस्तीत लोक एका मशिदीच्या छतावर इतके दिवस जीव वाचवण्यासाठी राहिले होते. त्यामुळे कधीही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला की, येथील ग्रामस्थांच्या त्या कटू आठवणी पुन्हा ताज्या होतात.

-----------------------------

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे खेड तालुक्यातील अलसुरे गावातील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे़