शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एका टँकरने प्रशासनाची कसरत

By admin | Updated: May 4, 2016 00:54 IST

गुहागर तालुका : दोन वर्षानंतरही प्रशासनाची पाणीपुरवठ्याची तीच यंत्रणा--लोकमत विशेष

संकेत गोयथळे -- गुहागर तालुक्यामध्ये दरवर्षीचा टंचाई कृती आराखडा व त्यामधील वाड्यांची दुर्गम स्थिती व मोठे अंतर लक्षात घेता किमान दोन टँकरने पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. गेली दोन वर्षे एकाच टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने मोठी कसरत करावी लागत होती. यावेळीही चार गावे व बारा वाड्यांना एप्रिलपासूनच टँकरने पाणीपुरवठा गुहागर पंचायत समिती करत आहे. गेल्या काही वर्षांचा आढावा घेता तालुक्यातील साखरीत्रिशूळ गावामध्ये पहिल्या टँकरची मागणी होते. यापाठोपाठ धोपावे गावाला दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तालुक्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक गावे व वाड्यावस्त्या या दुर्गम भागात वसलेल्या आहेत. अशा स्थितीत प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागते. एकावेळी एका भागात किंवा गावातच पाणीपुरवठा केल्यानंतर त्याच दिवसामध्ये अन्य ठिकाणी पाणीपुरवठा करणे मोठ्या अंतरामुळे शक्य होत नाही. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व टंचाईग्रस्त गावांमधील वाड्यांची संख्या लक्षात घेता किमान दोन टँकर मिळणे आवश्यक आहेत. मागील दोन वर्षांचा विचार करता व भास्कर जाधव राज्यमंत्री असतानाही एकाच टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. अलोरे येथील महाराष्ट्र उपअभियंता यांत्रिकी क्र. १ अलोरे विभागाकडून गेले दोन वर्षे टँकर उपलब्ध न झाल्याने बांधकाम विभागाच्या डम्परवर ५ हजार लीटरची टाकी बसवून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावेळी अलोरे उपअभियंता यांत्रिकी क्र. १ कडून टँकर उपलब्ध झाला. मात्र, बांधकाम विभागाच्या डम्परवरील चालक दीर्घकालीन सुटीवर गेल्याने दुसरा टँकर उपलब्ध असूनदेखील चालक उपलब्ध नसल्याने सध्या केवळ एकाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर पंचायत समितीच्या बोलेरो वाहनावर असलेल्या चालकांना पाठविण्यास तहसील कार्यालयातून सांगितले जात आहे. मात्र, छोटे वाहन चालविणारे चालक डंपर चालविण्यास तयार नाहीत. तालुक्यातील साखरीत्रिशूळ व धोपावे या गावांनी प्रथम टँकरची मागणी केली. साखरीत्रिशूळ मधील सात वाड्यांपैकी म्हसकरवाडी व मोहल्ला येथे गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा बांधल्याने येथील विहिरींतील पाण्याची पातळी राखण्यात यश आले आहे. मात्र, गवळवाडी, सुतारवाडी, बौध्दवाडी, तेलीवाडी या वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या वाड्यांची एकूण लोकसंख्या ४८५ असून, याठिकाणी दोन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धोपावे गावात जलशिवार योजना राबवूनही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गावातील जाधववाडी, पाटीलवाडी, गुढेकरवाडी, विघ्नहर्तावाडी, हनुमानवाडी या वाड्यांमध्येही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. वेळणेश्वर भाटीमध्ये १३३ कुटुंबे तर कोंडकारुळ, बुधाल, येभाडे येथेही प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. एका टँकरने या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने अद्यापही पालशेत व निवोशीमधील १२० ग्रामस्थ टँकरपासून वंचित आहेत. पंचायत समितीकडे निवोशी मधील ग्रामस्थांकडून वारंवार टँकरची मागणी केली जात आहे. यात आता शिवणे गावातील चार वाड्यांची भर पडली आहे. गतवर्षी एकही विंधन विहीर झाली नसल्याने गतवर्षीचीच पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. शिवणे गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेमधून ३३ लाखांची पाणी योजना प्रस्तावित असून, अद्याप तिला मंजुरी मिळालेली नाही. यामुळे या गावातील ९ वाड्यांतील १०२७ ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.कृती आराखडा : दोन टँकर मंजूर, तरीही...?तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यात ११ गावे व ४४ वाड्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या मंजुरीमध्ये शिवणे गावातील चार वाड्यांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मागणी असलेल्या ९ वाड्यांपैकी पाच वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असून, चार वाड्यांचा प्रश्न अंधारातच आहे. यातच तालुक्यासाठी दोन टँकर मंजूर असताना केवळ एकाच टँकरने पाणीपुरवठा होत आहे.