शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

एका टँकरने प्रशासनाची कसरत

By admin | Updated: May 4, 2016 00:54 IST

गुहागर तालुका : दोन वर्षानंतरही प्रशासनाची पाणीपुरवठ्याची तीच यंत्रणा--लोकमत विशेष

संकेत गोयथळे -- गुहागर तालुक्यामध्ये दरवर्षीचा टंचाई कृती आराखडा व त्यामधील वाड्यांची दुर्गम स्थिती व मोठे अंतर लक्षात घेता किमान दोन टँकरने पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. गेली दोन वर्षे एकाच टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने मोठी कसरत करावी लागत होती. यावेळीही चार गावे व बारा वाड्यांना एप्रिलपासूनच टँकरने पाणीपुरवठा गुहागर पंचायत समिती करत आहे. गेल्या काही वर्षांचा आढावा घेता तालुक्यातील साखरीत्रिशूळ गावामध्ये पहिल्या टँकरची मागणी होते. यापाठोपाठ धोपावे गावाला दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तालुक्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक गावे व वाड्यावस्त्या या दुर्गम भागात वसलेल्या आहेत. अशा स्थितीत प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागते. एकावेळी एका भागात किंवा गावातच पाणीपुरवठा केल्यानंतर त्याच दिवसामध्ये अन्य ठिकाणी पाणीपुरवठा करणे मोठ्या अंतरामुळे शक्य होत नाही. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व टंचाईग्रस्त गावांमधील वाड्यांची संख्या लक्षात घेता किमान दोन टँकर मिळणे आवश्यक आहेत. मागील दोन वर्षांचा विचार करता व भास्कर जाधव राज्यमंत्री असतानाही एकाच टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. अलोरे येथील महाराष्ट्र उपअभियंता यांत्रिकी क्र. १ अलोरे विभागाकडून गेले दोन वर्षे टँकर उपलब्ध न झाल्याने बांधकाम विभागाच्या डम्परवर ५ हजार लीटरची टाकी बसवून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावेळी अलोरे उपअभियंता यांत्रिकी क्र. १ कडून टँकर उपलब्ध झाला. मात्र, बांधकाम विभागाच्या डम्परवरील चालक दीर्घकालीन सुटीवर गेल्याने दुसरा टँकर उपलब्ध असूनदेखील चालक उपलब्ध नसल्याने सध्या केवळ एकाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर पंचायत समितीच्या बोलेरो वाहनावर असलेल्या चालकांना पाठविण्यास तहसील कार्यालयातून सांगितले जात आहे. मात्र, छोटे वाहन चालविणारे चालक डंपर चालविण्यास तयार नाहीत. तालुक्यातील साखरीत्रिशूळ व धोपावे या गावांनी प्रथम टँकरची मागणी केली. साखरीत्रिशूळ मधील सात वाड्यांपैकी म्हसकरवाडी व मोहल्ला येथे गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा बांधल्याने येथील विहिरींतील पाण्याची पातळी राखण्यात यश आले आहे. मात्र, गवळवाडी, सुतारवाडी, बौध्दवाडी, तेलीवाडी या वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या वाड्यांची एकूण लोकसंख्या ४८५ असून, याठिकाणी दोन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धोपावे गावात जलशिवार योजना राबवूनही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गावातील जाधववाडी, पाटीलवाडी, गुढेकरवाडी, विघ्नहर्तावाडी, हनुमानवाडी या वाड्यांमध्येही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. वेळणेश्वर भाटीमध्ये १३३ कुटुंबे तर कोंडकारुळ, बुधाल, येभाडे येथेही प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. एका टँकरने या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने अद्यापही पालशेत व निवोशीमधील १२० ग्रामस्थ टँकरपासून वंचित आहेत. पंचायत समितीकडे निवोशी मधील ग्रामस्थांकडून वारंवार टँकरची मागणी केली जात आहे. यात आता शिवणे गावातील चार वाड्यांची भर पडली आहे. गतवर्षी एकही विंधन विहीर झाली नसल्याने गतवर्षीचीच पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. शिवणे गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेमधून ३३ लाखांची पाणी योजना प्रस्तावित असून, अद्याप तिला मंजुरी मिळालेली नाही. यामुळे या गावातील ९ वाड्यांतील १०२७ ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.कृती आराखडा : दोन टँकर मंजूर, तरीही...?तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यात ११ गावे व ४४ वाड्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या मंजुरीमध्ये शिवणे गावातील चार वाड्यांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मागणी असलेल्या ९ वाड्यांपैकी पाच वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असून, चार वाड्यांचा प्रश्न अंधारातच आहे. यातच तालुक्यासाठी दोन टँकर मंजूर असताना केवळ एकाच टँकरने पाणीपुरवठा होत आहे.