शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

जिल्ह्यात १०६ नव्या रुग्णांची भर; दोघांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०६ कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २६ ...

रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०६ कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २६ जण बरे झाले आहेत. ३४६५ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ७६,२८६ इतकी असून २३५२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७२,६६४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १०६९ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून शनिवारी आलेल्या अहवालानुसार, दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या १०६ इतकी असून यापैकी आरटीपीसीआरमध्ये ६३ आणि रॅपिड अँटिजन चाचणीत ४३ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. शनिवारी आणि त्याआधीचा एक असे दोन मृत्यू नोंदविण्यात आले असून हे दोन्हीही रुग्ण चिपळूण तालुक्यातील आहेत. आतापर्यंत झालेल्या एकूण २३५२ मृत्यूंमध्ये ५० आणि त्यावरील जास्त वयोगटातील रुग्ण १९७५, तर सहव्याधी असलेल्या ८२७ रुग्णांचा समावेश आहे. सध्या १०६९ रुग्ण उपचार घेत आहेत. यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ७९५ इतकी असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २७४ इतकी आहे.

आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांमध्ये ७६,२८६ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून तब्बल ६ लाख ६७ हजार ७१ जणांच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या साडतीन ते ४ हजारांपर्यंतच चाचण्या केल्या जात आहेत. सध्या रुग्ण संख्या काहीशी कमी वाटत असली तरीही अधूनमधून कमी-जास्त होत आहे. अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने आगामी गणेशाेत्सवात सर्वच नागरिकांनी कोरोनाविषयक खबरदारी घेत नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.