शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

जिल्ह्यात नव्याने २० रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गेल्या २४ तासात जिल्ह्यात नव्याने २० कोरोना रुग्णांची भर पडली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ...

रत्नागिरी : गेल्या २४ तासात जिल्ह्यात नव्याने २० कोरोना रुग्णांची भर पडली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०३१८ झाली असून ३७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ६५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर कोरोनामुक्त झालेल्या १९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात काेरोना रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. शिमगोत्सवात ही संख्या अधिक वाढण्याचा धोका आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली असून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनासमोर पेच उभा राहिला आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात २० जण कोरोनाबाधित झाले. यात आरटीपीसीआर चाचणी १६, तर रॅपिड अँटिजेन चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या ४ जणांचा समावेश आहे. रत्नागिरीतील ९, चिपळूण आणि खेड या तालुक्यांत प्रत्येकी ४, दापोली २ आणि लांजा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत १२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ५५ जण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत.

आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये १०,३१८ रुग्ण पाॅझिटिव्ह आले असून ९०,८२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ९७९१ रुग्ण (९४.८९ टक्के) बरे होऊन घरी गेले आहेत, तर ३७१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.