शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

जिल्ह्यात १३२ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:31 IST

रत्नागिरी : गेल्या २४ तासात तब्बल १३२ नव्या कोरोना रुग्णाची नव्याने भर पडली असून दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

रत्नागिरी : गेल्या २४ तासात तब्बल १३२ नव्या कोरोना रुग्णाची नव्याने भर पडली असून दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या ५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच ६८७ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ११५७० इतकी झाली असून ३८० जणांचा मृत्यू झाला असून १०४१० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मार्चच्या प्रारंभापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. गेल्या ५ दिवसांत जिल्ह्यात ४६३ रुग्ण वाढले आहेत. दिवसेंदिवस वाढू लागलेल्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयांबरोबरच, कोविड आरोग्य केंद्रे, कोविड केअर सेंटर यात वाढ करण्यात आली असून खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे.

सोमवारी जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार एकाच दिवसात १३२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यात आरटीपीसीआर चाचणीत ११३ तर अँटिजेन चाचणीत १९ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ३१, दापोली २९, खेड १५, चिपळूण २८, संगमेश्वर ९, लांजा १९ आणि राजापूर १ असे १३२ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून गुहागर आणि मंडणगड तालुक्यात एकही रुग्ण सापडला नाही. तसेच दापोलीतील ८५ वर्षीय पुरुष रुग्णाचा आणि रत्नागिरीतील ५३ वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालये तसेच कोरोना केअर सेंटर आणि कोरोना आरोग्य केंद्रात एकूण ५९९ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी २९३ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.