शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

विद्याधर कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST

हातखंबा : हातखंबा गावचे सुपुत्र, नंदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रत्नागिरी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सध्या जिल्हा परिषद प्राथमिक ...

हातखंबा : हातखंबा गावचे सुपुत्र, नंदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रत्नागिरी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाजूळ येथे कार्यरत असलेले विद्याधर लक्ष्मण कांबळे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

विद्याधर कांबळे यांची एकूण २६ वर्षे सेवा झालेली आहे. १७ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे कार्य करीत ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या सहकार्याने शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केलेले आहे. शिक्षक म्हणून कार्य करत असताना विविध शैक्षणिक स्पर्धा, विविध साहित्य संग्रह निर्मिती, सांस्कृतिक विकास, विज्ञान जत्रा यावर त्यांनी भर दिलेला आहे. ग्रामस्थ, शिक्षक यांच्या सहकार्यातून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात ते अग्रेसर राहिलेले आहेत. बालआनंद मेळावा, महिला आनंद मेळावा आणि वृक्षारोपण यासारखे राष्ट्रीय कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल करबुडे-लाजूळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.