शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांवर लवकरच कारवाई

By admin | Updated: November 3, 2014 23:28 IST

लोटे औद्योगिक वसाहत : पर्यावरण मंत्र्यांनी मागवली माहिती

आवाशी : लोटे औद्योगिक वसाहतीत अनधिकृत भंगार व्यवसाय तेजीत सुरू आहे. याबाबत चौकशी करण्याचे निवेदन देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपन्यांना पाठीशी घालत असल्याची तक्रार या भागातील शेतकरी करीत आहेत. यामागे कंपनी, भंगार व्यावसायिक, अधिकारी यांचे रॅकेट असावे, अशी शंकाही निर्माण झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या सचिवांनी याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला देऊनही अद्याप कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपर जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबतचे लेखी स्वरुपात आदेश दिले असल्याने भंगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.चिपळूण व खेड एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमधून रसायनयुक्त भंगार घेण्यासाठी २५ पेक्षा जास्त व्यावसायिक निर्माण झाले आहेत. हे अनधिकृत व्यावसायिक खोटे भंगार परवाना कंपनी, कारखान्यातून स्थानिक टोळ्यांना हाताशी धरुन हा व्यवसाय करीत आहेत. याबाबत एक निवेदन १६ सप्टेंबर रोजी औद्योगिक पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण नियंत्रण मंडळ, मुंबई, जिल्हाधिकारी रत्नागिरी, चिपळूण व खेड तहसीलदार यांना सादर करण्यात आले. त्यामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चिपळूण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोटे औद्योगिक क्षेत्रातील या व्यवसायासंदर्भात कारवाई सुरु केली आहे.लोटे औद्योगिक क्षेत्रात भंगार व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून, रसायनयुक्त कचरा अन्य ठिकाणी टाकला जातो. अंधाराचा फायदा घेत कंपन्या नदीपात्रात, नाल्यात, शेतात, विहीर परिसरात दुर्लक्षित व निर्जनस्थळी हे भंगार गूपचूप टाकत असतात. यापासून नदीनाले, शेती, विहिरीचे पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृत होत आहेत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित अधिकारी ही प्रकरणे दडपून टाकत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. किती भंगार व्यावसायिक आहेत, याचीही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईच्या दृष्टीने पर्यावरण विभाग, राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. (वार्ताहर)स्थानिक पोलीस अनभिज्ञचदोन महिन्यांपूर्वी आदेश प्राप्त झाले असतानाही लोटे औद्योगिक वसाहतीत दैनंदिन भंगार व्यवसाय राजरोसपणे तेजीत सुरु आहे. या पत्राबाबत स्थानिक पोलिसांना काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही कंपन्यांमधून स्थलांतराच्या नावाखाली भंगार काढण्याचे काम सुरु आहे. कंपनी व ठेकेदार ते काम अधिकृत असून, याची माहिती सर्व विभागांना लेखी स्वरुपात दिली असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या पत्राच्या आधारे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.