शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रत्नागिरीत नियम न पाळणाऱ्या ५ दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

तन्मय दाते लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेअंतर्गत ...

तन्मय दाते

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेअंतर्गत काही दुकानांना मुभा देण्यात आली आहे. या दुकान मालकांनाही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दिली. रत्नागिरीत नियम न पाळणाऱ्या ५ दुकानांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. ज्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये मुुभा देेण्यात आली आहे त्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या दुकान मालकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना काेराेनाचे नियम सांगणे बंधनकारक आहे. तसेच दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालूनच दुकानात प्रवेश देणे बंधनकारक आहे. दुकानामध्ये ५ पेक्षा अधिक लोक असतील तर अशा लोकांवरही कारवाई करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. बुधवारी अत्यावश्यक सेवेमध्ये नसलेल्या ५ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले. वाघमारे पुढे म्हणाले की, नागरिकांनी पण नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे नागरिक नियमांचे पालन नाही करणार अशा लोकांवरही पाेलीस कारवाई करणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.