शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

रत्नागिरी विभागात १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 5, 2016 00:03 IST

एस. टी. महामंडळ : ४७ जणांचे निलंबन, ७५ बडतर्फ

रत्नागिरी : पैशांचा अपहार, प्रवाशांशी उध्दट वर्तन तसेच सततची गैरहजेरी यामुळे वर्षभरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील एकूण १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत ३६ वाहक, ११ चालक निलंबित करण्यात आले, तर ७५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्यांव्दारे दररोज ९ हजार फेऱ्यांमधून एकूण २ लाख ५० हजार प्रवाशांची वाहतूक होते. दररोज २ लाख ३३ किलोमीटर इतका प्रवास होत असल्याने एस. टी.ला मिळणारे दररोजचे उत्पन्न सरासरी ६१ लाख ९ हजार रुपये इतके आहे. प्रवाशांची वाहतूक करताना अनेकवेळा प्रवाशांशी उध्दटपणे वाद घालणे, गैरवर्तन करणे, थांब्यावर प्रवासी थांबलेले असताना गाडीत जागा असूनही पुढे नेवून गाडी थांबवणे, प्रवाशांना न घेता गाडी रिकामी घेऊन जाणे आदी विविध कारणांमुळे जिल्ह्यातील एकूण ११ चालकांवर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन महिन्यांसाठी चालकांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे मंडणगड, दापोली, खेड, राजापूर आगारातील प्रत्येकी एक व रत्नागिरी आगारातील ७ चालक निलंबित करण्यात आले.तिकीट व पैशांच्या देवाणघेवाणीमुळे झालेल्या अपहारामध्ये जिल्ह्यातील ३६ वाहकांवर कारवाई करण्यात आली. वाहकांनाही ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. मंडणगड ३, दापोली १, खेड ७, चिपळूण ९, गुहागर २, देवरूख २, रत्नागिरी ५, राजापूर ४ व लांजा आगारातील ३ वाहकांचा यात समावेश आहे. सातत्याने कामावर गैरहजर राहून कामाचा खोळंबा करणाऱ्या व प्रशासनाला त्रास देणाऱ्या एकूण ७५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चालक ४१, वाहक २४, कार्यशाळा कर्मचारी ५ व प्रशासकीय कर्मचारी ५ यांचा समावेश आहे. वेळोवेळी समज देऊनही कामात व वर्तणुकीत सुधारणा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून बडतर्फ करण्यात येते. वर्षभरात ७५ कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. प्रवाशीभिमुख आणि विनम्र सेवा तसेच निर्धोक वाहतूक यासाठी एस. टी. प्रयत्नशील असून या चौकटीत न वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)प्रवासी : सौजन्याने वागायला शिका...एस. टी.चे अनेक कर्मचारी प्रवाशांशी उध्दटपणे वागतात, हेच यावरून दिसून आले आहे. एकीकडे एस. टी.चे भारमान घटत असताना दुसरीकडे एस. टी. कर्मचाऱ्यांनाही त्याच्याशी काही सोयरसुतक नसल्यानेच महामंडळ तोट्यात चालत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.