शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रत्नागिरी विभागात १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 5, 2016 00:03 IST

एस. टी. महामंडळ : ४७ जणांचे निलंबन, ७५ बडतर्फ

रत्नागिरी : पैशांचा अपहार, प्रवाशांशी उध्दट वर्तन तसेच सततची गैरहजेरी यामुळे वर्षभरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील एकूण १२२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत ३६ वाहक, ११ चालक निलंबित करण्यात आले, तर ७५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. रत्नागिरी विभागात एकूण ७५० गाड्यांव्दारे दररोज ९ हजार फेऱ्यांमधून एकूण २ लाख ५० हजार प्रवाशांची वाहतूक होते. दररोज २ लाख ३३ किलोमीटर इतका प्रवास होत असल्याने एस. टी.ला मिळणारे दररोजचे उत्पन्न सरासरी ६१ लाख ९ हजार रुपये इतके आहे. प्रवाशांची वाहतूक करताना अनेकवेळा प्रवाशांशी उध्दटपणे वाद घालणे, गैरवर्तन करणे, थांब्यावर प्रवासी थांबलेले असताना गाडीत जागा असूनही पुढे नेवून गाडी थांबवणे, प्रवाशांना न घेता गाडी रिकामी घेऊन जाणे आदी विविध कारणांमुळे जिल्ह्यातील एकूण ११ चालकांवर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन महिन्यांसाठी चालकांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे मंडणगड, दापोली, खेड, राजापूर आगारातील प्रत्येकी एक व रत्नागिरी आगारातील ७ चालक निलंबित करण्यात आले.तिकीट व पैशांच्या देवाणघेवाणीमुळे झालेल्या अपहारामध्ये जिल्ह्यातील ३६ वाहकांवर कारवाई करण्यात आली. वाहकांनाही ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. मंडणगड ३, दापोली १, खेड ७, चिपळूण ९, गुहागर २, देवरूख २, रत्नागिरी ५, राजापूर ४ व लांजा आगारातील ३ वाहकांचा यात समावेश आहे. सातत्याने कामावर गैरहजर राहून कामाचा खोळंबा करणाऱ्या व प्रशासनाला त्रास देणाऱ्या एकूण ७५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चालक ४१, वाहक २४, कार्यशाळा कर्मचारी ५ व प्रशासकीय कर्मचारी ५ यांचा समावेश आहे. वेळोवेळी समज देऊनही कामात व वर्तणुकीत सुधारणा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून बडतर्फ करण्यात येते. वर्षभरात ७५ कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. प्रवाशीभिमुख आणि विनम्र सेवा तसेच निर्धोक वाहतूक यासाठी एस. टी. प्रयत्नशील असून या चौकटीत न वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)प्रवासी : सौजन्याने वागायला शिका...एस. टी.चे अनेक कर्मचारी प्रवाशांशी उध्दटपणे वागतात, हेच यावरून दिसून आले आहे. एकीकडे एस. टी.चे भारमान घटत असताना दुसरीकडे एस. टी. कर्मचाऱ्यांनाही त्याच्याशी काही सोयरसुतक नसल्यानेच महामंडळ तोट्यात चालत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.