शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदांचे लागलेले ग्रहण अजूनही सुटलेले नाही. या शाळांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदांचे लागलेले ग्रहण अजूनही सुटलेले नाही. या शाळांमध्ये ९१४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातच शिक्षक बदल्यांना तात्पुरती स्थगिती मिळालेली असली तरी ती उठल्यावर अनेक शिक्षक जिल्हाअंतर्गत बदलीने अन्य जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या बदल्या झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

शिक्षक भरती २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही शासनाकडून रिक्त पदे भरण्यास चालढकल केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये जाणारी मुले ही ग्रामीण भागातील गरीब परिस्थितीतील असतात. त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला नाही तर त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. रिक्त पदे भरल्यास इतर शिक्षकांवरील ताण कमी होऊन तेही उत्तम प्रकारे विद्यार्थी घडवू शकतील.

मोफत शिक्षण, आहार, पुस्तके अशी ओळख जिल्हा परिषद शाळांची झालेली आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणही उत्तम प्रकारे मिळत असतानाही विद्यार्थ्यांचा लोंढा आजही इंग्रजी शाळांकडे जाताना दिसतो. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव असल्याने कार्यरत शिक्षकांवरही कामाचा ताण वाढत आहे. मात्र, गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षकावर भर देण्यात आली होती.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी जिल्ह्याला ७३६३ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ६८६९ आणि उर्दू माध्यमाच्या ४९४ शिक्षकांच्या पदांचा समावेश आहे. मराठी माध्यमाचे ८२० शिक्षक आणि उर्दू माध्यमाच्या ९४ शिक्षकांची पदे अशी एकूण ९१४ पदे रिक्त आहेत. त्यातच १० टक्के शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाअंतर्गत बदलीसाठी ३०० शिक्षकांनी ना हरकत प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र, प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यास या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांना खो बसणार आहे.

----------------

पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न

एकीकडे शिक्षण विभाग प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच जेथे विद्यार्थी शिकतात त्या शाळांना शिक्षक देण्याची मेहरबानी करीत नसल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून पहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकून पसंतीस उतरू लागल्या असताना रिक्त पदांचे ग्रहण मात्र गुणवत्तेवर परिणाम करीत आहे.

-----------------

जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शाळा - २५७४

शिक्षकांची मंजूर पदे - ७३६३ (मराठी माध्यम- ६८६९)

(उर्दू माध्यम- ४९४)

शिक्षकांची रिक्त पदे- ९१४ (मराठी माध्यम- ८२०)

(उर्दू माध्यम- ९४)