शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

गावस्तरावर विलगीकरण कक्षाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

चिपळूण : गृह अलगीकरण बंद केल्यानंतर आता प्रशासनाने गाव स्तरावरच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. दोन ...

चिपळूण : गृह अलगीकरण बंद केल्यानंतर आता प्रशासनाने गाव स्तरावरच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये हे विलगीकरण कक्ष सुरू केले जाणार आहेत. त्यानुसार तालुक्यातील ३२ गावांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

विलगीकरण कक्षासाठी स्वच्छ सार्वजनिक इमारत, शौचालयाची व्यवस्था उभारावी. यासाठी लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

विलगीकरण कक्ष उभारणीसाठी गावातील शाळा, अन्य इमारतीसह त्यात असलेल्या सुविधांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी तलाठी, ग्रामसेवक व सरपंचांची अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यानुसार सर्व लेखी माहिती मागविण्यात आली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचे संकट वाढले आहे. तालुक्यात सध्या ६४४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील ४८१ जण घरातच उपचार घेत आहेत. मात्र, यातील अनेकजण १४ ते १७ दिवस वेगळे राहणे अपेक्षित असताना ५ ते ७ दिवसातच गावभर फिरत आहेत. कोरोना संसर्गात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू केली जाणार आहेत.

तालुक्यातील १६७ गावांपैकी ३२ गावे या निकषात बसत असून, तेथे ही केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठीच ही बैठक घेण्यात आली. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. ज्योती यादव आदींनी घेतलेल्या या बैठकीत गावातील शाळा, हायस्कूल, समाज मंदिरे यांची माहिती मागविण्यात आली असून, तेथे वीज, पाणी, शौचालये आदी भौतिक सुविधा आहेत का, याचा आढावा घेण्यात आला. तसेच येत्या दोन दिवसात त्याची लेखी माहिती संबंधित ग्रामपंचायतींकडून मागविण्यात आली आहे.

पन्नासजण कोराेनामुक्त

मंगळवारी ५० जण बरे झाले आहेत. सध्या तालुक्यातील ६४४ जणांवर कामथे, वहाळ, पेढांबे या शासकीय कोविड सेंटरसह खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३३० झाली आहे. तालुक्यातील एकूण ८ हजार ७७१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील ७ हजार ७९७ जण बरे झाले आहेत.