शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

गावस्तरावर विलगीकरण कक्षाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

चिपळूण : गृह अलगीकरण बंद केल्यानंतर आता प्रशासनाने गाव स्तरावरच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. दोन ...

चिपळूण : गृह अलगीकरण बंद केल्यानंतर आता प्रशासनाने गाव स्तरावरच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये हे विलगीकरण कक्ष सुरू केले जाणार आहेत. त्यानुसार तालुक्यातील ३२ गावांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

विलगीकरण कक्षासाठी स्वच्छ सार्वजनिक इमारत, शौचालयाची व्यवस्था उभारावी. यासाठी लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

विलगीकरण कक्ष उभारणीसाठी गावातील शाळा, अन्य इमारतीसह त्यात असलेल्या सुविधांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी तलाठी, ग्रामसेवक व सरपंचांची अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यानुसार सर्व लेखी माहिती मागविण्यात आली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचे संकट वाढले आहे. तालुक्यात सध्या ६४४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील ४८१ जण घरातच उपचार घेत आहेत. मात्र, यातील अनेकजण १४ ते १७ दिवस वेगळे राहणे अपेक्षित असताना ५ ते ७ दिवसातच गावभर फिरत आहेत. कोरोना संसर्गात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू केली जाणार आहेत.

तालुक्यातील १६७ गावांपैकी ३२ गावे या निकषात बसत असून, तेथे ही केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठीच ही बैठक घेण्यात आली. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. ज्योती यादव आदींनी घेतलेल्या या बैठकीत गावातील शाळा, हायस्कूल, समाज मंदिरे यांची माहिती मागविण्यात आली असून, तेथे वीज, पाणी, शौचालये आदी भौतिक सुविधा आहेत का, याचा आढावा घेण्यात आला. तसेच येत्या दोन दिवसात त्याची लेखी माहिती संबंधित ग्रामपंचायतींकडून मागविण्यात आली आहे.

पन्नासजण कोराेनामुक्त

मंगळवारी ५० जण बरे झाले आहेत. सध्या तालुक्यातील ६४४ जणांवर कामथे, वहाळ, पेढांबे या शासकीय कोविड सेंटरसह खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३३० झाली आहे. तालुक्यातील एकूण ८ हजार ७७१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील ७ हजार ७९७ जण बरे झाले आहेत.