शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

चिपळूण : जिल्ह्यात १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने त्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या ...

चिपळूण : जिल्ह्यात १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने त्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील व्यापाऱ्यांना दुकानातील साहित्य स्थलांतरित करण्यासाठी बुधवारी मुदत दिली होती. त्यानुसार बाजारपेठेतील बहुतांशी व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवले.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ढगफुटीसारखा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने शहरासह नदीकाठच्या सुमारे चार गावांमधील १ हजार ६०८ नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित केले जाणार आहे. मात्र, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बाजारपेठेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी येथील प्रशासनाने व्यापाऱ्यांना बुधवारी दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यासाठी मुदत दिली होती. चिपळूण व्यापारी महासंघटनेनेही व्यापाऱ्यांना याविषयी आवाहन केले होते.

त्याप्रमाणे बाजारपेठेतील चिंचनाका, गांधी चौक, पानगल्ली, नाथ पै चौक, भेंडीनाका, नाईक कंपनी बाजारपूल, रंगोबा साबळे मार्गावरील व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविले. त्यासाठी व्यापाऱ्यांनी अनेक दिवसांनी आपली दुकाने उघडली होती.