शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएच्या जनसुनावणीत शेतक-यांच्या ७०० हरकती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:28 IST

जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी घशात घालू नका, जमिनींचे संपादन नव्या भूसंपादन कायद्यानुसार करावे आणि पेण-अलिबाग रेल्वेला विरोध असे प्रमुख मुद्दे स्थानिकांनी मांडले

अलिबाग : हरित क्षेत्र नष्ट करून सरसकट जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी घशात घालू नका, जमिनींचे संपादन नव्या भूसंपादन कायद्यानुसार करावे आणि पेण-अलिबाग रेल्वेला विरोध असे प्रमुख मुद्दे स्थानिकांनी मांडले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने आयोजित केलेल्या जनसुनावणीमध्ये तब्बल ७०० सूचना व हरकती दाखल करण्यात आल्या.अलिबाग पोलीस परेड मैदानावरील जंजिरा सभागृहात विकास आराखड्याबाबतची जनसुनावणी पार पडली. या जनसुनावणीमध्ये विकासाला विरोध असल्याचा सूर दिसून आला. अलिबाग येथील प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासाठी नुसते संपादन करु न भागणार नाही. कोणत्या वेळेत प्रकल्प पूर्ण करणार याचा टाइम बॉउण्ड ठरणे आवश्यक आहे. भविष्यात प्रकल्पच झाला नाही तर, स्थानिक शेतकºयांच्या जमिनी घेऊन त्या तशाच एमएमआरडीएकडे पडून राहतील, असे वरसोलीचे सरपंच मिलिंद कवळे यांनी सुनावणीत ठणकावले. आमचा रेल्वे येण्याला विरोध नाही, परंतु तो प्रकल्प ठरावीक कालावधीत पूर्ण करणार याची हमी कोण देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.अलिबाग तालुक्यातील धेरंड शहापूर परिसरातील हा पट्टा हरित पट्टा आहे. येथे मोठ्या संख्येने सुपीक जमिनी आहेत. यातील बराचसा भाग हा खारलॅण्डचा आहे. कायद्यानुसार हरित पट्ट्याचे रु पांतर औद्योगिक पट्ट्यात करता येणार नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी महानगर नियोजन समितीच्या सदस्या उमा अडुसुमिल्ली यांच्या निदर्शनास आणून दिले. भविष्यात वाढणारी लोकसंख्या गृहीत धरु न एमएमआरडीए विकासाचे नियोजन करीत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याचे काय नियोजन केले आहे असा प्रश्न आमदार सुभाष पाटील यांनी केला. पाण्याचे नियोजन नसेल तर, नवी मुंबईला वळवलेले हेटवणे धरणाचे पाणी अडवा किंवा तालुक्यातील सांबरकुंड आणि सारळघोळ ही प्रस्तावित धरणे एमएमआरडीएने स्वखर्चाने बांधावीत. त्यातून पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.>अस्तित्वात असणाºया आरसीएफच्या रेल्वे ट्रॅकचा वापर करण्याची सूचनारेल्वेसाठी डबल ट्रॅकची गरज नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित होणार आहे. यासाठी अस्तित्वात असणाºया आरसीएफच्या रेल्वे ट्रॅकचा वापर करावा, अशी सूचना आल्याचे महानगर नियोजन समितीचे सदस्य सुरेश सुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु आरसीएफचा रेल्वे ट्रॅक हा प्रवासी वाहतुकीसाठी योग्य असल्याबाबत रेल्वेकडून सांगण्यात आले नसल्याकडेही सुर्वे यांनी लक्ष वेधले. परंतु मध्यंतरी अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी याला तत्त्वत: मान्यता मिळाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे अलिबागला रेल्वे येणार की नाही याबाबत चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.ज्यांना सुनावणीला येता आले नाही त्यांच्यासाठी पुन्हा सुनावणी घेण्यात यावी अशी मागणीही यावेळी पुढे आली होती. हरकती सूचना एमएमआरडीएकडे दाखल करण्याची मुभा असल्याने नागरिकांनी त्या दाखल कराव्यात, असे आवाहन उमा अडुसुमिल्ली यांनी केले.एमएमआरडीएने सुनावणीबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती, मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक पंचायतीने सुनावणीबाबत लेखी पत्र देऊन कळवणे गरजेचे होते, असा मुद्दा राजन भगत यांनी उपस्थित केला. त्यामुळे सुनावणीला सर्वांनाच उपस्थित राहता आले नाही. एमएमआरडीएच्या या भूमिकेविरोधात वरसोली ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले होते.