शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

एमएमआरडीएच्या जनसुनावणीत शेतक-यांच्या ७०० हरकती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:28 IST

जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी घशात घालू नका, जमिनींचे संपादन नव्या भूसंपादन कायद्यानुसार करावे आणि पेण-अलिबाग रेल्वेला विरोध असे प्रमुख मुद्दे स्थानिकांनी मांडले

अलिबाग : हरित क्षेत्र नष्ट करून सरसकट जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी घशात घालू नका, जमिनींचे संपादन नव्या भूसंपादन कायद्यानुसार करावे आणि पेण-अलिबाग रेल्वेला विरोध असे प्रमुख मुद्दे स्थानिकांनी मांडले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने आयोजित केलेल्या जनसुनावणीमध्ये तब्बल ७०० सूचना व हरकती दाखल करण्यात आल्या.अलिबाग पोलीस परेड मैदानावरील जंजिरा सभागृहात विकास आराखड्याबाबतची जनसुनावणी पार पडली. या जनसुनावणीमध्ये विकासाला विरोध असल्याचा सूर दिसून आला. अलिबाग येथील प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासाठी नुसते संपादन करु न भागणार नाही. कोणत्या वेळेत प्रकल्प पूर्ण करणार याचा टाइम बॉउण्ड ठरणे आवश्यक आहे. भविष्यात प्रकल्पच झाला नाही तर, स्थानिक शेतकºयांच्या जमिनी घेऊन त्या तशाच एमएमआरडीएकडे पडून राहतील, असे वरसोलीचे सरपंच मिलिंद कवळे यांनी सुनावणीत ठणकावले. आमचा रेल्वे येण्याला विरोध नाही, परंतु तो प्रकल्प ठरावीक कालावधीत पूर्ण करणार याची हमी कोण देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.अलिबाग तालुक्यातील धेरंड शहापूर परिसरातील हा पट्टा हरित पट्टा आहे. येथे मोठ्या संख्येने सुपीक जमिनी आहेत. यातील बराचसा भाग हा खारलॅण्डचा आहे. कायद्यानुसार हरित पट्ट्याचे रु पांतर औद्योगिक पट्ट्यात करता येणार नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी महानगर नियोजन समितीच्या सदस्या उमा अडुसुमिल्ली यांच्या निदर्शनास आणून दिले. भविष्यात वाढणारी लोकसंख्या गृहीत धरु न एमएमआरडीए विकासाचे नियोजन करीत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याचे काय नियोजन केले आहे असा प्रश्न आमदार सुभाष पाटील यांनी केला. पाण्याचे नियोजन नसेल तर, नवी मुंबईला वळवलेले हेटवणे धरणाचे पाणी अडवा किंवा तालुक्यातील सांबरकुंड आणि सारळघोळ ही प्रस्तावित धरणे एमएमआरडीएने स्वखर्चाने बांधावीत. त्यातून पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.>अस्तित्वात असणाºया आरसीएफच्या रेल्वे ट्रॅकचा वापर करण्याची सूचनारेल्वेसाठी डबल ट्रॅकची गरज नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित होणार आहे. यासाठी अस्तित्वात असणाºया आरसीएफच्या रेल्वे ट्रॅकचा वापर करावा, अशी सूचना आल्याचे महानगर नियोजन समितीचे सदस्य सुरेश सुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु आरसीएफचा रेल्वे ट्रॅक हा प्रवासी वाहतुकीसाठी योग्य असल्याबाबत रेल्वेकडून सांगण्यात आले नसल्याकडेही सुर्वे यांनी लक्ष वेधले. परंतु मध्यंतरी अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी याला तत्त्वत: मान्यता मिळाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे अलिबागला रेल्वे येणार की नाही याबाबत चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.ज्यांना सुनावणीला येता आले नाही त्यांच्यासाठी पुन्हा सुनावणी घेण्यात यावी अशी मागणीही यावेळी पुढे आली होती. हरकती सूचना एमएमआरडीएकडे दाखल करण्याची मुभा असल्याने नागरिकांनी त्या दाखल कराव्यात, असे आवाहन उमा अडुसुमिल्ली यांनी केले.एमएमआरडीएने सुनावणीबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती, मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक पंचायतीने सुनावणीबाबत लेखी पत्र देऊन कळवणे गरजेचे होते, असा मुद्दा राजन भगत यांनी उपस्थित केला. त्यामुळे सुनावणीला सर्वांनाच उपस्थित राहता आले नाही. एमएमआरडीएच्या या भूमिकेविरोधात वरसोली ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले होते.