शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

खड्डे भरणाऱ्या ठेकेदारांचे ६ कोटी अजूनही थकीतच

By admin | Updated: March 13, 2016 01:04 IST

जिल्हा परिषद : तीन वर्षे उलटून दमडीही नाही

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नादुरुस्त रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी ६ कोटी रुपयांची कामे करण्यात आली होती. तीन वर्षे उलटले तरी अद्यापही या ठेकेदारांना या कामाची दमडीही न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदार रडकुंडीला आले आहेत. जिल्ह्याच्या शहरी भागातील रस्ते चकाचक दिसत असले, तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती त्याउलट आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता ग्रामीण भाग डोंगराळ व दुर्गम आहे. ग्रामीण भागातील रस्ते वाईट स्थितीत आहेत. सन २०१२ पूर्वीच्या पावसाळ्यामध्ये आलेल्या पुरामुळे रस्ते, साकव उखडले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दळणवळणाच्या दृष्टीने फारच त्रासदायक ठरत होते. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केल्याने आज या रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडकच्या माध्यमातून गेल्या १० ते १५ वर्षात खेडी मुख्य रस्त्यांना जोडण्याचे काम करण्यात आले. मात्र, तरीही ग्रामीण भागातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे पावसाळ्याच्या कालावधीत अनेक गावांमध्ये एस. टी. बस नेण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच जनतेचेही हाल झाले होते. त्यासाठी रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण होणे आवश्यक होते.दरम्यान, पूरग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शासनस्तरावर मंत्र्यांशी चर्चाही केली होती. त्यानंतर या रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेला १७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीवरुन जोरदार राजकारण जिल्हा परिषदेत सुरु होते. त्यात बांधकाम विभागाचे अधिकारी अडचणीत आले होते. अखेर या निधीतून ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची डांबरीकरण व खडीकरणाची कामे करण्यात आली होती. सन २०१२पूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली होती. या रस्त्यांचे खड्डे भरण्याची कामे अ गटातून घेण्यात आली होती. या रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली होती. सुमारे ६ कोटी रुपयांची रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे ठेकेदारांनी केली होती.त्यावेळी रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी येत होता. त्यामुळे ही कामे करण्यास जिल्ह्यातील ठेकेदार पुढे सरसावले होते. ग्रामीण भागातील खड्डे भरण्याची कामे पूर्ण केल्यानंतर ठेकेदारांना त्या कामाचे पैसे वेळेवर मिळणे आवश्यक होते. मात्र, शासनाने या कामांचे पैसे अद्यापही दिलेले नाहीत. त्यामुळे ठेकेदारांनी या कामांचे पैसे मिळण्यासाठी अनेकदा शासनाला लेखी निवेदनेही दिली.तरीही त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे हे ठेकेदार गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. तरीही त्यांना अद्याप ६ कोटी रुपयांपैकी दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे आजही जिल्हा परिषद ठेकेदारांचे ६ कोटी रुपये देणे लागते.अधिकाऱ्यांची कसरत : पैसे देण्यासाठी शासनाकडून चालढकलदोन वर्षापूर्वी पुरामध्ये हानी झालेल्या रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी शासनाने जिल्हा परिषदेला १७ कोटी ५० लाख रुपये दिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जिल्हा परिषदेला दिला. मात्र, तीन वर्षापूर्वीचे ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी शासनाकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठेकेदारांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यांची दुरवस्थाजिल्हा परिषदेची कामे त्वरित करणाऱ्या ठेकेदारांना बिलांसाठी तीन वर्षे झगडावे लागत असल्याने ठेकेदारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.