शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

माणी गावातील डांबर प्लांटला अभय कुणाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST

०९आरटीएन०२.जेपीजी लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : रहदारीच्या मार्गावर व भरवस्तीत सुरू असणाऱ्या विनापरवाना डांबर प्लांटला अभय कुणाचे आहे? असा ...

०९आरटीएन०२.जेपीजी

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : रहदारीच्या मार्गावर व भरवस्तीत सुरू असणाऱ्या विनापरवाना डांबर प्लांटला अभय कुणाचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा डांबर प्लांट बंद करण्याची मागणी माणी (ता. खेड) गावच्या ग्रामस्थांच्यावतीने शत्रुघ्न उर्फ बंटी आंब्रे व अशोक आंब्रे यांनी केली आहे.

खेड तालुक्यातील माणी गावच्या हद्दीतील लवेल - माणी - सवेणी रस्त्यावर बौद्धवाडी लगत राहुल कन्स्ट्रक्शन कंपनीचा डांबर प्लांट सुरु आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरोग्य विभागाचा कोणताही परवाना नसताना गेल्या वीस वर्षांपासून हा प्लांट सुरु आहे. या प्लांटमुळे गावात ध्वनी व वायूप्रदूषण कमालीचे होत आहे. याच प्लांटच्या शेजारी गावातील पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल आहे. त्या पिण्याच्या पाण्यावरही याचा परिणाम होत आहे. प्लांटच्या समोरच गावातून वाहणाऱ्या नदीचे पात्र आहे. या नदीत गावातील पाळीव प्राणी पाण्यासाठी तर महिला कपडे धुण्यासाठी येत असतात. त्यामुळे सर्वच बाजूंनी हा त्रासदायक ठरणारा डांबर प्लांट बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी याआधीही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.

दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी ग्रामस्थांनी पालकमंत्री अनिल परब व तत्कालीन पर्यावरण मंत्री आदिती तटकरे यांनाही निवेदन दिले आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी हा प्लांट बंद करणेबाबत ग्रामपंचायतीत संपूर्ण ग्रामसभेचा ठराव आला आहे. त्यानुसारच याच्याशी संबंधित असणाऱ्या मंत्री, अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याही पत्र व्यवहाराला कन्स्ट्रक्शनच्या मालकांनी केराची टोपली दाखविली. मंत्री व अधिकारी निष्क्रिय ठरले आहेत. ग्रामपंचायतीनेही संबंधित प्लांटला संमती वा नाहरकत दाखला दिला नसतानाही कुणाच्या आशीर्वादाने हा प्लांट बिनदिक्कतपणे सुरू आहे, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

या प्लांटजवळच कंपनीने कामगारांना राहण्यासाठी विनापरवाना सतरा खोल्या बांधल्या असून, निर्मल ग्रामपंचायत व हागणदारीमुक्त ग्रामपंचायत असताना पाच खोल्यांमध्ये राहणारे महिला, पुरुष कामगार व त्यांचे कुटुंब उघड्यावर वा नदीत शौचास बसत आहेत, असेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. जेथे पाण्याची जॅकवेल आहे तेथेही उघड्यावर शौचास जाणाऱ्या इथल्या कामगारांची संख्या जास्त आहे. एकूणच सर्व मार्गानी माणी गावच्या पर्यावरणाचा समतोल या कंपनीने धोक्यात आणला आहे. त्यामुळे अनेक वर्षे या कंपनीच्या प्लांटच्या बंदच्या मागणीला कोणताही अधिकारी तत्परता दाखवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चौकट

प्लांटची जागादेखील बिनशेती नसल्याचे समोर येत आहे. मागील काही वर्षांपूर्वी याच कंपनीने गावच्या आंब्रेवाडीशेजारी काळा दगड उत्खननासाठी केलेल्या भू सुरुंगात याच गावातील गावकऱ्यांच्या घरांना तडे गेल्याची घटना घडली होती. तेव्हापासून ही कंपनी चर्चेत राहिली आहे.