शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘आमआदमी’ला मिळतोय विम्याचा भक्कम आधार

By admin | Updated: December 9, 2014 01:23 IST

ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा,

शोभना कांबळे --रत्नागिरीआमआदमी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात अपघाती व नैसर्गिक मृत्यू झालेल्या १५५ भूमिहीन कुटुंबांना आतापर्यंत ४८ लाख ७५ हजार इतका लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा, या हेतूने शासनाने या कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी ‘आमआदमी विमा योजना’ २ आॅक्टोबर २००७ पासून अस्तित्त्वात आणली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्थीचा विमा उतरविण्यात येतो. संपूर्ण विम्याची रक्कम शासनाकडून भरली जाते. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला ही योजना लागू करता येते. साधारणत: २०१२ सालापासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थीचे अपघाती निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रूपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रूपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रूपये अर्थसहाय करण्यात येते.या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १५५ कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली आहे. यात संगमेश्वरमधील २ आणि लांजामधील एका भूमिहीन कर्त्या व्यक्तिचा समावेश आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी ३५ भूमिहीन कुटुंबांना मिळाला आहे.तसेच लाभार्थीच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रति तिमाही ३०० रूपये इतकी शिष्यवृत्ती मिळते. या योजनेचाही लाभ येत्या मार्चपूर्वी ३० हजार विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून होत आहेत.ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास अशा कुटुंबाना ‘आमआदमी विमा योजना’ आधार ठरत आहे. लाभार्थींच्या मुलांना अनुसूचित जातीची किंवा आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती मिळत असेल किंवा तो मागासवर्गीय, आदिवासी वसतिगृहात मोफत निवास व जेवण घेत असेल तर त्याला ‘आम आदमी विमा योजना’ शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो.या योजनेत लाभार्थीचे अपघाती निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रूपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रूपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रूपये कुटुंबाला लाभ मिळतो.खेडेगावातील भूमिहीन शेतमजूर (५ एकर पेक्षा कमी जिरायती किंवा २.५ एकर म्हणजेच कमी बागायती जमीन धारण करणारी व्यक्ती) आमआदमी योजनेकरिता पात्र ठरू शकते. लाभार्थीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयाला ‘आम आदमी विमा योजना’, राष्ट्रीय कुटुंब कल्याण आणि शेतकरी अपघात विमा योजना या तिन्ही योजनांचा लाभ मिळू शकतो.