शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

जिल्ह्यात ‘आमआदमी’ला मिळतोय विम्याचा भक्कम आधार

By admin | Updated: December 9, 2014 01:23 IST

ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा,

शोभना कांबळे --रत्नागिरीआमआदमी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात अपघाती व नैसर्गिक मृत्यू झालेल्या १५५ भूमिहीन कुटुंबांना आतापर्यंत ४८ लाख ७५ हजार इतका लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले तर त्या कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळते. अशा कुटुंबाला आधार मिळावा, या हेतूने शासनाने या कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी ‘आमआदमी विमा योजना’ २ आॅक्टोबर २००७ पासून अस्तित्त्वात आणली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्थीचा विमा उतरविण्यात येतो. संपूर्ण विम्याची रक्कम शासनाकडून भरली जाते. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुटुंबप्रमुखाला ही योजना लागू करता येते. साधारणत: २०१२ सालापासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थीचे अपघाती निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रूपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रूपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रूपये अर्थसहाय करण्यात येते.या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १५५ कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली आहे. यात संगमेश्वरमधील २ आणि लांजामधील एका भूमिहीन कर्त्या व्यक्तिचा समावेश आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी ३५ भूमिहीन कुटुंबांना मिळाला आहे.तसेच लाभार्थीच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रति तिमाही ३०० रूपये इतकी शिष्यवृत्ती मिळते. या योजनेचाही लाभ येत्या मार्चपूर्वी ३० हजार विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून होत आहेत.ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास अशा कुटुंबाना ‘आमआदमी विमा योजना’ आधार ठरत आहे. लाभार्थींच्या मुलांना अनुसूचित जातीची किंवा आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती मिळत असेल किंवा तो मागासवर्गीय, आदिवासी वसतिगृहात मोफत निवास व जेवण घेत असेल तर त्याला ‘आम आदमी विमा योजना’ शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो.या योजनेत लाभार्थीचे अपघाती निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला ७५,००० रूपये अर्थसहाय शासनाकडून केले जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३०,००० रूपये अर्थसहाय केले जाते. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५,००० रूपये, तर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७,५०० रूपये कुटुंबाला लाभ मिळतो.खेडेगावातील भूमिहीन शेतमजूर (५ एकर पेक्षा कमी जिरायती किंवा २.५ एकर म्हणजेच कमी बागायती जमीन धारण करणारी व्यक्ती) आमआदमी योजनेकरिता पात्र ठरू शकते. लाभार्थीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयाला ‘आम आदमी विमा योजना’, राष्ट्रीय कुटुंब कल्याण आणि शेतकरी अपघात विमा योजना या तिन्ही योजनांचा लाभ मिळू शकतो.