शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आली गाैराई अंगणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गणरायाच्या आगमनानंतर पाहुण्या येणाऱ्या माहेरवाशीण गौराईचे रविवारी दुपारी सर्वत्र आगमन झाले. ...

रत्नागिरी : गणरायाच्या आगमनानंतर पाहुण्या येणाऱ्या माहेरवाशीण गौराईचे रविवारी दुपारी सर्वत्र आगमन झाले. गाैराईचे आगमनही अगदी साधेपणाने करण्यात आले. मात्र, महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. घरोघरी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. काही भाविकांकडे ज्येष्ठा, कनिष्ठा अशा दोन गौरींची, तर काही ठिकाणी एकाच गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

नदी, विहिरी, तसेच पाणवठ्यावरून गौरी वाजतगाजत आणल्या जातात. मात्र, काेराेनाच्या निर्बंधामुळे महिलांनी साधेपणाने गाैरी आणल्या. तांब्यात पाच/सात खडे, हळदीच्या पानात तीळ, तेरड्याची फुले मिळून प्रतीकात्मक गौरी तयार केली जाते. सुवासिनी, युवती प्रतीकात्मक गौरी घेऊन आल्यानंतर त्यांचे दारात पारंपरिक पद्धतीने औंक्षण करण्यात आले. भाकरी तुकडा ओवाळून घरात आणल्यानंतर गौरीला सजविण्यात आले. काठापदराची साडी, तसेच आभूषणांनी गाैरी सजवून गणपती शेजारीच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. पहिल्या दिवशी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावर्षी कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यात येत असल्याने फुगड्याचा फेर मात्र फारसा रंगला नाही.

सर्वत्र साेमवारी गौरीपूजन करण्यात येणार आहे. यावर्षी पूर्वा नक्षत्रात गणपती आल्याने नवविवाहितांचे ओवसे भरले जाणार आहेत. त्यामुळे ओवशासाठी सुपे, फळे, फराळाचे पदार्थ खरेदी सुरू होती. गौरीपूजनासाठी फळभाज्या, फळे, फराळाच्या जिन्नसांनी सुपे सजवून गौरीसमोर वाण ठेवले जाते. गौरीसाठी फुले, शिवाय वाणासाठी पाच प्रकारच्या फळभाज्यांचे काप विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होते. गौरीपूजनादिवशी काही ठिकाणी गोडाधोडाचा नैवेद्य दाखविण्यात येत असला तरी काही ठिकाणी मांसाहार केला जाताे. गौरीपूजनासाठी लागणारी फळे, शेवंतीची, झेंडूची फुले, वेण्या, हार, किरीट, कमरपट्टा, हळदीची पाने, केळीची पाने यांची खरेदी प्राधान्याने करण्यात येत होती.