शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

अंगणवाड्यांच्या बालकांसाठी आधारकार्ड

By admin | Updated: February 25, 2015 00:11 IST

३१ मार्चच्या उद्दीष्टपूर्तीकडे लक्ष : शासनाच्या शोधमोहिमेत अडथळेच अडथळे...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अंगणवाड्यांमधील ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम सुरु आहे. सुमारे ९० हजार बालकांचे मार्चअखेर आधार कार्ड काढण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावयाचे आहे. मात्र, आधारकार्ड काढण्यासाठी केवळ ३५ मशिन्स असल्याने हे उद्दिष्ट पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आधारकार्डच्या कामाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आधारकार्ड हे आता प्रत्येक शासकीय, निमशासकीय व अन्य कामासाठी वापरण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने आधारकार्ड हे सक्तीचे केले आहे. विद्यार्थ्यांना आधारकार्ड काढता यावे, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये आधारकार्डची मोहीम राबवण्यात आली होती.० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे आधारकार्ड असावे, यासाठी शासनाने मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे आधारकार्ड काढता यावे, म्हणून अंगणवाड्यांमध्ये कार्ड काढण्याचे काम शासनाकडून सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी आधारकार्ड काढण्यात येणाऱ्या बालकांचे त्याच्या आई किंवा वडिलांबरोबरचा एकत्रित छायाचित्र, आई किंवा वडिलांचा अंगठा आदींचा वापर हे करण्यात येतो. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात २८९५ अंगणवाड्या व ११ बालगृह चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये सुमारे ९० हजार बालके आहेत. या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम नुकतेच सुरुकरण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून केवळ ३५ मशिन्सचा वापर करण्यात येत आहे. आपला जिल्हा डोंगराळ व दुर्गम भागाचा असल्याने या भागातील अंगणवाड्यांपर्यंत पोहोचून आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे आधारकार्ड काढण्यासाठी ३१ मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा उद्देश सफल होणे शक्य नाही. शासनाने आधारकार्ड काढण्यासाठीच्या मशिन्स वाढवणे आवश्यक आहे. ही मशिन्स वाढली तरच आधारकार्ड देण्याबाबतचे उद्दीष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)