शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अंगणवाड्यांच्या बालकांसाठी आधारकार्ड

By admin | Updated: February 25, 2015 00:11 IST

३१ मार्चच्या उद्दीष्टपूर्तीकडे लक्ष : शासनाच्या शोधमोहिमेत अडथळेच अडथळे...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अंगणवाड्यांमधील ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम सुरु आहे. सुमारे ९० हजार बालकांचे मार्चअखेर आधार कार्ड काढण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावयाचे आहे. मात्र, आधारकार्ड काढण्यासाठी केवळ ३५ मशिन्स असल्याने हे उद्दिष्ट पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आधारकार्डच्या कामाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आधारकार्ड हे आता प्रत्येक शासकीय, निमशासकीय व अन्य कामासाठी वापरण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने आधारकार्ड हे सक्तीचे केले आहे. विद्यार्थ्यांना आधारकार्ड काढता यावे, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये आधारकार्डची मोहीम राबवण्यात आली होती.० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे आधारकार्ड असावे, यासाठी शासनाने मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे आधारकार्ड काढता यावे, म्हणून अंगणवाड्यांमध्ये कार्ड काढण्याचे काम शासनाकडून सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी आधारकार्ड काढण्यात येणाऱ्या बालकांचे त्याच्या आई किंवा वडिलांबरोबरचा एकत्रित छायाचित्र, आई किंवा वडिलांचा अंगठा आदींचा वापर हे करण्यात येतो. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात २८९५ अंगणवाड्या व ११ बालगृह चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये सुमारे ९० हजार बालके आहेत. या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम नुकतेच सुरुकरण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून केवळ ३५ मशिन्सचा वापर करण्यात येत आहे. आपला जिल्हा डोंगराळ व दुर्गम भागाचा असल्याने या भागातील अंगणवाड्यांपर्यंत पोहोचून आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे आधारकार्ड काढण्यासाठी ३१ मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा उद्देश सफल होणे शक्य नाही. शासनाने आधारकार्ड काढण्यासाठीच्या मशिन्स वाढवणे आवश्यक आहे. ही मशिन्स वाढली तरच आधारकार्ड देण्याबाबतचे उद्दीष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)