शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

कोरोनातही शिष्यवृत्ती परीक्षेला ९२ टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या संकटामुळे एप्रिलपासून लांबलेली शिष्यवृत्ती परीक्षा गुरुवारी सर्वत्र एकाचवेळी घेण्यात आली. कोरोनाची भीती असूनही जिल्ह्यातील १३९ परीक्षा ...

रत्नागिरी : कोरोनाच्या संकटामुळे एप्रिलपासून लांबलेली शिष्यवृत्ती परीक्षा गुरुवारी सर्वत्र एकाचवेळी घेण्यात आली. कोरोनाची भीती असूनही जिल्ह्यातील १३९ परीक्षा केंद्रांवर ११ हजार ४३२ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५१४ विद्यार्थी (९२ टक्के) विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते.

कोरोना संकटामुळे वारंवार शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. अखेर तज्ज्ञांशी चर्चा करून शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सर्वत्र गुरुवारी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील १३९ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ९० केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी ७ हजार १९५ विद्यार्थी हजर होते. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ हजार ६८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.