शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

९० टक्के शाळांना क्रीडांगणे नाहीत

By admin | Updated: May 30, 2016 00:44 IST

एक लाखाचे अनुदान : खेळाडू निर्मितीत मोठी अडचण

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २४९८ प्राथमिक शाळांना क्रीडांगणे नाहीत. तब्बल ९० टक्के शाळांमध्ये क्रीडांगणे नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये खेळाडू निर्माण होण्यास ही मोठी अडचण ठरत आहे. तरीही शिक्षकवर्गाकडून खेळाडू निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण २७८६ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक (इयत्ता १ ते ४) १६७८, उच्च माध्यमिक (इयत्ता १ ते ७ ते ४ ते ७) १०९९ व माध्यमिक व उच्च माध्यमिक ९ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गतवर्षी शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय माहितीचा अहवाल शासनाला सादर केला होता. या अहवालानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांची माहिती एकत्रित करुन ती शासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा पायाभूत भौतिक सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. त्यामध्ये अपंगांसाठीचे रॅम्प, स्वयंपाकगृह, संरक्षक भिंत, क्रीडांगण तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी किमान एक वर्गखोली असणेही आवश्यक आहे.पूर्वी क्रीडांगणाचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या होते. त्यासाठी अनेकांनी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये शाळा दिसत आहेत. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारील शेतांच्या मळ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. (शहर वार्ताहर)अनुदानाचा काय उपयोग : केवळ क्रीडा साहित्यावरच खर्चविविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाकडून क्रीडांगण विकासासाठी १ लाख रुपयांचे अनुदान प्रत्येक शाळेला दिले जाते. त्यामधून क्रीडा साहित्य, ग्राऊंड निर्मितीसाठी खर्च करण्यात येतो. मात्र, शाळांना क्रीडांगणेच नसल्याने खेळाडू कसे निर्माण होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. शेतमळ्यांमध्ये क्रीडांगणे तयार करून ही मुले सराव करत आहेत. हा सराव करताना त्यांना अनेकवेळा जखमा होत आहेत. त्यामुळे त्यांना खेळातील नैपुण्य दाखविण्यासही वाव मिळत नाही. एकीकडे शासन शालेय जीवनातूनच खेळाडू तयार व्हावेत, यासाठी विविध स्पर्धा घेत असताना शाळांना मैदानेच उपलब्ध नसल्याने खेळाडू तयार कसे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.