शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

९० टक्के शाळांना क्रीडांगणे नाहीत

By admin | Updated: May 30, 2016 00:44 IST

एक लाखाचे अनुदान : खेळाडू निर्मितीत मोठी अडचण

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २४९८ प्राथमिक शाळांना क्रीडांगणे नाहीत. तब्बल ९० टक्के शाळांमध्ये क्रीडांगणे नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये खेळाडू निर्माण होण्यास ही मोठी अडचण ठरत आहे. तरीही शिक्षकवर्गाकडून खेळाडू निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण २७८६ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक (इयत्ता १ ते ४) १६७८, उच्च माध्यमिक (इयत्ता १ ते ७ ते ४ ते ७) १०९९ व माध्यमिक व उच्च माध्यमिक ९ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गतवर्षी शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय माहितीचा अहवाल शासनाला सादर केला होता. या अहवालानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांची माहिती एकत्रित करुन ती शासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा पायाभूत भौतिक सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. त्यामध्ये अपंगांसाठीचे रॅम्प, स्वयंपाकगृह, संरक्षक भिंत, क्रीडांगण तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी किमान एक वर्गखोली असणेही आवश्यक आहे.पूर्वी क्रीडांगणाचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या होते. त्यासाठी अनेकांनी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये शाळा दिसत आहेत. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारील शेतांच्या मळ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. (शहर वार्ताहर)अनुदानाचा काय उपयोग : केवळ क्रीडा साहित्यावरच खर्चविविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाकडून क्रीडांगण विकासासाठी १ लाख रुपयांचे अनुदान प्रत्येक शाळेला दिले जाते. त्यामधून क्रीडा साहित्य, ग्राऊंड निर्मितीसाठी खर्च करण्यात येतो. मात्र, शाळांना क्रीडांगणेच नसल्याने खेळाडू कसे निर्माण होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. शेतमळ्यांमध्ये क्रीडांगणे तयार करून ही मुले सराव करत आहेत. हा सराव करताना त्यांना अनेकवेळा जखमा होत आहेत. त्यामुळे त्यांना खेळातील नैपुण्य दाखविण्यासही वाव मिळत नाही. एकीकडे शासन शालेय जीवनातूनच खेळाडू तयार व्हावेत, यासाठी विविध स्पर्धा घेत असताना शाळांना मैदानेच उपलब्ध नसल्याने खेळाडू तयार कसे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.