शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अडीच महिन्यांत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

रत्नागिरी : सुरूवातीपासून जोर धरलेल्या पावसामुळे गेल्या अडीच महिन्यांत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला आहे. जून आणि जुलै महिन्याची ...

रत्नागिरी : सुरूवातीपासून जोर धरलेल्या पावसामुळे गेल्या अडीच महिन्यांत सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला आहे. जून आणि जुलै महिन्याची सरासरीही यंदाच्या पावसाने ओलांडली आहे. सध्या पाऊस सरींवर असला तरीही येणारी सर जोरदार येत असल्याने पावसाचा जोर कायम आहे.

गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेने कमी होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर विविध वादळांमुळे अगदी डिसेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम बऱ्यापैकी लांबल्याने पाणीटंचाई उशिरा सुरू झाली होती.

यंदा मात्र १६ मे रोजी झालेल्या ताैक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने पुढे आठवडाभर पाऊस राहिला. त्यानंतरही १ जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली. अधूनमधून विश्रांती असली तरीही दुसऱ्या आठवड्यातही पावसाचा जोर वाढला होता. मात्र, या काळातही जोरदार पडलेल्या पावसामुळे जून महिन्यातील सरासरीही पावसाने ओलांडली.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ३३६४.२२ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. जून महिन्यात ८१८, जुलै महिन्यात १२८६, ऑगस्ट महिन्यात ८२९ आणि सप्टेंबर महिन्यात ४३१ मिलिमीटर इतका साधारणपणे पाऊस पडतो. यंदा जून महिन्यात ९११ मिलिमीटर पाऊस झाला आणि जुलै महिन्यात १,७२१ मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजे जूनमध्ये ९३ आणि जुलै महिन्यात ४३५ मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे. २० ते २२ जुलै या कालावधीत तर जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस २,८४९ मिलिमीटर इतका असून, सरासरीच्या ८४ टक्के इतका झाला आहे तर गतवर्षीच्या तुलनेने ५९३ मिलिमीटर अधिक झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात आता ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. श्रावणसरी सुरू झाल्या असल्या तरी अजूनही पाऊस जोरदार सरींनी पडत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याची सरासरीही पाऊस ओलांडण्याची शक्यता वाटू लागली आहे. सध्या या पावसामुळे वातावरणात काहीअंशी गारवा जाणवत आहे.