शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ७९ धाेकादायक इमारती, मरण्याची हाैस नाही पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहरातील एकूण ७९ इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. नगर परिषदेकडून संबंधित घरमालकांना ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहरातील एकूण ७९ इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. नगर परिषदेकडून संबंधित घरमालकांना स्थलांतरासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे तर ५१ इमारतींचे बहुतांश बांधकाम मोडकळीस आले आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून अन्यत्र स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींचे बहुतांश मालक अन्यत्र राहात असून, अनेक घरे रिकामीच आहेत. तर काही इमारतींमध्ये भाडेकरू राहात आहेत. वर्षानुवर्षे वास्तव्य असल्याने ही मंडळी येथून हलत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून दरवर्षी सर्वेक्षण करून मोडकळीस आलेल्या इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या जातात. नगर परिषदेचे कर्मचारी स्वत: जाऊन रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी नोटीस देतात. मालक नसल्यास इमारतीच्या प्रवेशव्दारावर नोटीस चिकटवली जाते. सध्या कोरोनामुळे प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याने वर्तमानपत्रातून नोटीस बजावण्यात आली आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पडझड होऊन जीवित व वित्तहानीची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय अन्यत्र स्थलांतराची सूचनाही केली आहे.

रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथील एक इमारत मोडकळीस आली असून, बहुतांश भाग तुटला आहे. त्यामुळे नगर परिषदेने स्थलांतराची नोटीस बजावली आहे.

रिकाम्या इमारती

जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींना पावसाळ्यात धोका असल्याने इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन करण्यात येते. शहरातील बहुतांश इमारती रिकाम्या असून, मालक अन्यत्र राहात आहेत. काही इमारतींमध्ये मात्र भाडेकरू राहात असल्याने ते अन्यत्र जात नसल्याची तक्रार आहे.

शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण दरवर्षी करण्यात येते. सर्वेक्षणानंतर जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी काळजी घेण्यासाठी नागरिकांना स्थलांतराची नोटीस देण्यात येते. कोरोनामुळे प्रत्यक्ष नोटीस देणे शक्य नसल्यामुळे वर्तमानपत्रातून नोटीस बजावण्यात आली आहे. नागरिकांनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

- संतोष जाधव, सहाय्यक नगररचनाकार, नगर परिषद, रत्नागिरी.

जुन्या, जीर्ण इमारती

शहरातील ५१ इमारतींचा संपूर्ण भाग तुटलेला आहे. अनेक वर्षांपूर्वीच्या या इमारती असून, मोडकळीस आल्याने अनेक मालक वर्षानुवर्षे राहत नाहीत. मात्र, इमारती उभ्या आहेत. पावसाळ्यात जीर्ण झालेला भाग ढासळत आहे. त्यामुळे लगतच्या बांधकामांना याचा त्रास होत असल्याने लगतचे इमारत मालक याबाबत तक्रार करत आहेत.

शहरातील २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे. अनेक इमारतींचे मालक त्याठिकाणी राहत नाहीत परंतु भाडेकरू राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षानुवर्षे राहात असल्याने भविष्यात कूळ म्हणून राहिल्याचा फायदा होईल, या एकमेव आशेवर ते राहतात. परंतु, पावसाळ्यात इमारतीला धोका असल्याचे सांगूनसुध्दा भाडेकरू अन्यत्र जात नसल्याने प्रशासनाकडून मात्र नोटीस दिली जाते.

कोरोना संकटामुळे यावर्षी नगर परिषदेकडून कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यास जाणे अशक्य असल्याने मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन वर्तमानपत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नागरिकांना भविष्यातील धोका लक्षात घेता, अन्यत्र स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. पावसाळ्यातील चार महिने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने इमारतींची पडझड होऊन दुर्घटना घडू नये, यासाठीच ही नोटीस बजावण्यात आली आहे.