शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

रत्नागिरीत ७९ धाेकादायक इमारती, मरण्याची हाैस नाही पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहरातील एकूण ७९ इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. नगर परिषदेकडून संबंधित घरमालकांना ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहरातील एकूण ७९ इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. नगर परिषदेकडून संबंधित घरमालकांना स्थलांतरासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे तर ५१ इमारतींचे बहुतांश बांधकाम मोडकळीस आले आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून अन्यत्र स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींचे बहुतांश मालक अन्यत्र राहात असून, अनेक घरे रिकामीच आहेत. तर काही इमारतींमध्ये भाडेकरू राहात आहेत. वर्षानुवर्षे वास्तव्य असल्याने ही मंडळी येथून हलत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून दरवर्षी सर्वेक्षण करून मोडकळीस आलेल्या इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या जातात. नगर परिषदेचे कर्मचारी स्वत: जाऊन रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी नोटीस देतात. मालक नसल्यास इमारतीच्या प्रवेशव्दारावर नोटीस चिकटवली जाते. सध्या कोरोनामुळे प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याने वर्तमानपत्रातून नोटीस बजावण्यात आली आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पडझड होऊन जीवित व वित्तहानीची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय अन्यत्र स्थलांतराची सूचनाही केली आहे.

रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथील एक इमारत मोडकळीस आली असून, बहुतांश भाग तुटला आहे. त्यामुळे नगर परिषदेने स्थलांतराची नोटीस बजावली आहे.

रिकाम्या इमारती

जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींना पावसाळ्यात धोका असल्याने इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन करण्यात येते. शहरातील बहुतांश इमारती रिकाम्या असून, मालक अन्यत्र राहात आहेत. काही इमारतींमध्ये मात्र भाडेकरू राहात असल्याने ते अन्यत्र जात नसल्याची तक्रार आहे.

शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण दरवर्षी करण्यात येते. सर्वेक्षणानंतर जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी काळजी घेण्यासाठी नागरिकांना स्थलांतराची नोटीस देण्यात येते. कोरोनामुळे प्रत्यक्ष नोटीस देणे शक्य नसल्यामुळे वर्तमानपत्रातून नोटीस बजावण्यात आली आहे. नागरिकांनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

- संतोष जाधव, सहाय्यक नगररचनाकार, नगर परिषद, रत्नागिरी.

जुन्या, जीर्ण इमारती

शहरातील ५१ इमारतींचा संपूर्ण भाग तुटलेला आहे. अनेक वर्षांपूर्वीच्या या इमारती असून, मोडकळीस आल्याने अनेक मालक वर्षानुवर्षे राहत नाहीत. मात्र, इमारती उभ्या आहेत. पावसाळ्यात जीर्ण झालेला भाग ढासळत आहे. त्यामुळे लगतच्या बांधकामांना याचा त्रास होत असल्याने लगतचे इमारत मालक याबाबत तक्रार करत आहेत.

शहरातील २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे. अनेक इमारतींचे मालक त्याठिकाणी राहत नाहीत परंतु भाडेकरू राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षानुवर्षे राहात असल्याने भविष्यात कूळ म्हणून राहिल्याचा फायदा होईल, या एकमेव आशेवर ते राहतात. परंतु, पावसाळ्यात इमारतीला धोका असल्याचे सांगूनसुध्दा भाडेकरू अन्यत्र जात नसल्याने प्रशासनाकडून मात्र नोटीस दिली जाते.

कोरोना संकटामुळे यावर्षी नगर परिषदेकडून कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यास जाणे अशक्य असल्याने मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन वर्तमानपत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नागरिकांना भविष्यातील धोका लक्षात घेता, अन्यत्र स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. पावसाळ्यातील चार महिने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने इमारतींची पडझड होऊन दुर्घटना घडू नये, यासाठीच ही नोटीस बजावण्यात आली आहे.