शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

रत्नागिरीत ७९ धाेकादायक इमारती, मरण्याची हाैस नाही पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहरातील एकूण ७९ इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. नगर परिषदेकडून संबंधित घरमालकांना ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहरातील एकूण ७९ इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. नगर परिषदेकडून संबंधित घरमालकांना स्थलांतरासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे तर ५१ इमारतींचे बहुतांश बांधकाम मोडकळीस आले आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून अन्यत्र स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींचे बहुतांश मालक अन्यत्र राहात असून, अनेक घरे रिकामीच आहेत. तर काही इमारतींमध्ये भाडेकरू राहात आहेत. वर्षानुवर्षे वास्तव्य असल्याने ही मंडळी येथून हलत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून दरवर्षी सर्वेक्षण करून मोडकळीस आलेल्या इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या जातात. नगर परिषदेचे कर्मचारी स्वत: जाऊन रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी नोटीस देतात. मालक नसल्यास इमारतीच्या प्रवेशव्दारावर नोटीस चिकटवली जाते. सध्या कोरोनामुळे प्रत्यक्ष जाणे शक्य नसल्याने वर्तमानपत्रातून नोटीस बजावण्यात आली आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पडझड होऊन जीवित व वित्तहानीची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय अन्यत्र स्थलांतराची सूचनाही केली आहे.

रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथील एक इमारत मोडकळीस आली असून, बहुतांश भाग तुटला आहे. त्यामुळे नगर परिषदेने स्थलांतराची नोटीस बजावली आहे.

रिकाम्या इमारती

जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींना पावसाळ्यात धोका असल्याने इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन करण्यात येते. शहरातील बहुतांश इमारती रिकाम्या असून, मालक अन्यत्र राहात आहेत. काही इमारतींमध्ये मात्र भाडेकरू राहात असल्याने ते अन्यत्र जात नसल्याची तक्रार आहे.

शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण दरवर्षी करण्यात येते. सर्वेक्षणानंतर जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी काळजी घेण्यासाठी नागरिकांना स्थलांतराची नोटीस देण्यात येते. कोरोनामुळे प्रत्यक्ष नोटीस देणे शक्य नसल्यामुळे वर्तमानपत्रातून नोटीस बजावण्यात आली आहे. नागरिकांनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

- संतोष जाधव, सहाय्यक नगररचनाकार, नगर परिषद, रत्नागिरी.

जुन्या, जीर्ण इमारती

शहरातील ५१ इमारतींचा संपूर्ण भाग तुटलेला आहे. अनेक वर्षांपूर्वीच्या या इमारती असून, मोडकळीस आल्याने अनेक मालक वर्षानुवर्षे राहत नाहीत. मात्र, इमारती उभ्या आहेत. पावसाळ्यात जीर्ण झालेला भाग ढासळत आहे. त्यामुळे लगतच्या बांधकामांना याचा त्रास होत असल्याने लगतचे इमारत मालक याबाबत तक्रार करत आहेत.

शहरातील २८ इमारतींचा काही भाग मोडकळीस आला आहे. अनेक इमारतींचे मालक त्याठिकाणी राहत नाहीत परंतु भाडेकरू राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षानुवर्षे राहात असल्याने भविष्यात कूळ म्हणून राहिल्याचा फायदा होईल, या एकमेव आशेवर ते राहतात. परंतु, पावसाळ्यात इमारतीला धोका असल्याचे सांगूनसुध्दा भाडेकरू अन्यत्र जात नसल्याने प्रशासनाकडून मात्र नोटीस दिली जाते.

कोरोना संकटामुळे यावर्षी नगर परिषदेकडून कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यास जाणे अशक्य असल्याने मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन वर्तमानपत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नागरिकांना भविष्यातील धोका लक्षात घेता, अन्यत्र स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. पावसाळ्यातील चार महिने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने इमारतींची पडझड होऊन दुर्घटना घडू नये, यासाठीच ही नोटीस बजावण्यात आली आहे.