शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

७५ पाणीपुरवठा योजना आता सौरऊर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:09 IST

रहीम दलाल।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना लवकरच सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. हे सौर पॅनल उभारण्यासाठी मेढा संस्थेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले आहेत.ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत पाणीपुरवठा ...

रहीम दलाल।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना लवकरच सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. हे सौर पॅनल उभारण्यासाठी मेढा संस्थेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले आहेत.ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गावे, वाड्यांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, दुसरीकडे नळपाणी योजनांच्या वीजबिलांवर भरमसाठ खर्च होतो. पाणीपुरवठा योजनांसाठी ३ हॉर्सपॉवर ते १० हॉर्सपॉवरच्या विद्युत पंपाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हजारो रुपयांचे वीजबिल येते. हा खर्च ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे ते अनेकवेळा प्रलंबित राहते आणि त्यामुळे ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केला जातो. यापूर्वी असे अनेक प्रकार घडले असून, त्यामुळे पाणीसाठा असतानाही केवळ वीज खंडित केल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा ठप्प होतो.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा योजनांचे वीजपंप सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मेढा संस्थेशी संपर्क साधून जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना वीजेऐवजी सौरऊर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी होणारा सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यास ‘मेढा’ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालणार आहेत. सौरऊर्जेमुळे या पाणीपुरवठा योजनांवर वीजेसाठी होणारा सुमारे ५० लाख रुपये एवढा खर्च वाचणार आहे.