शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

७५ पाणीपुरवठा योजना आता सौरऊर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:09 IST

रहीम दलाल।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना लवकरच सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. हे सौर पॅनल उभारण्यासाठी मेढा संस्थेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले आहेत.ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत पाणीपुरवठा ...

रहीम दलाल।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना लवकरच सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. हे सौर पॅनल उभारण्यासाठी मेढा संस्थेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले आहेत.ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गावे, वाड्यांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, दुसरीकडे नळपाणी योजनांच्या वीजबिलांवर भरमसाठ खर्च होतो. पाणीपुरवठा योजनांसाठी ३ हॉर्सपॉवर ते १० हॉर्सपॉवरच्या विद्युत पंपाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हजारो रुपयांचे वीजबिल येते. हा खर्च ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे ते अनेकवेळा प्रलंबित राहते आणि त्यामुळे ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केला जातो. यापूर्वी असे अनेक प्रकार घडले असून, त्यामुळे पाणीसाठा असतानाही केवळ वीज खंडित केल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा ठप्प होतो.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा योजनांचे वीजपंप सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मेढा संस्थेशी संपर्क साधून जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना वीजेऐवजी सौरऊर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी होणारा सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यास ‘मेढा’ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत जिल्ह्यातील ७५ पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालणार आहेत. सौरऊर्जेमुळे या पाणीपुरवठा योजनांवर वीजेसाठी होणारा सुमारे ५० लाख रुपये एवढा खर्च वाचणार आहे.